शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बसेसच्या फेऱ्या घटल्याने कुर्डूवाडी आगाराला दररोज ४.५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

कुर्डूवाडी : दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे कुर्डूवाडी आगारातील अनेक बसेसच्या ग्रामीण व शहरी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. काही ...

कुर्डूवाडी : दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे कुर्डूवाडी आगारातील अनेक बसेसच्या ग्रामीण व शहरी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. काही बसेसच्या फेऱ्या सुरू असूनही प्रवासी मिळत नाहीत. त्याचा फटका एस.टी.बस आगाराला बसला आहे. दररोज सुमारे ४.५ लाखांचा फटका बसत असल्याचे आगारप्रमुख मिथुन राठोड यांनी सांगितले.

कोरोनामुळे सध्या आगाराला तोट्यातल्या दिवसांना सामोरे जावे लागत आहे. तोट्यात गेलेली व्यवस्था भरून काढण्यासाठी चालक, वाहकसह अधिकारीवर्गाकडून प्रयत्न सुरु आहेत. कडक संचारबंदीमुळे प्रवासी वर्गानेही एस.टी.कडे पाठ फिरवली.

बोरवली, पुणे, उदगीर,माजलगाव,औरंगाबाद, नगर, सातारा,परभणी,या लांब पल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुरू केल्याने आगाराच्या उत्पन्नातवाढ झाली होती. पण १ एप्रिल पासून पुन्हा याच्यावर पूर्णपणे परिणाम झाला आहे. परिणामत: कुर्डूवाडी आगाराचे दररोजचे उत्पन्न ४ लाख ५० हजार इतके आहे. या एप्रिलमध्ये बसेस बंद असल्याने आर्थिक फटका आगाराला बसला आहे. आता येथील ४५ बसेसपैकी ४ बसेस व २४ कर्मचारी बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहेत. पंढरपूर विधानसभा कामासाठी माढा तहसीलला तीन बसेस सोडल्या. त्यातून आगाराला फक्त ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले.

--

३० कर्मचाऱ्यांचेच लसीकरण

३०३ कर्मचाऱ्यांपैकी ४५ वर्षाच्या पुढील कर्मचारी संख्या १०१ आहे. त्यापैकी ३० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या तीन दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख राठोड यांनी सांगितले.

----

४५ बसेस अन् ३०३ बसेस

कुर्डूवाडी आगारात एकूण ४५ बसेस असून कर्मचारी संख्या ३०३ आहे. चालक संख्या १२० वर आहे तर वाहक संख्या १०८ आहे. यांत्रिक कर्मचारी संख्या ४५ आणि प्रशासकीय कर्मचारी संख्या २० इतकी आहे. लॉकडाऊनपूर्वी आगाराच्या ५५ नियते चालू होते. वाहतूक पूर्वपदावर येत असताना ४३ नियते चालू होती.