शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यातील २७ हजार कार्डधारकांना रेशन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST

अक्कलकोट तालुक्यात १७९ रेशन दुकानदारांना परवानगी देण्यात आले आहे. मागील १५ वर्षांपूर्वी शासनाने त्रिकार्ड योजना अंमलात आणली. तेव्हा परिस्थितीनुसार ...

अक्कलकोट तालुक्यात १७९ रेशन दुकानदारांना परवानगी देण्यात आले आहे. मागील १५ वर्षांपूर्वी शासनाने त्रिकार्ड योजना अंमलात आणली. तेव्हा परिस्थितीनुसार एकाच कुटुंबातील अनेक नव्याने कुटुंब तयार झाले असले, तरी त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते. त्यावेळी राज्य शासन कार्ड फोड करून घेण्याची मुभा दिली होती. त्यावेळी अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली असूनही कार्ड वेगळे करून घेतल्याने त्यांना केसरी कार्ड देण्यात आले. यामुळे पूर्वीच्या कार्डामधून नावे कमी करण्यात आले. त्यानंतर त्यांना पूर्वीच्या कार्ड आणि नवीन कार्डावरही धान्य मिळणे बंद झाले. यामुळे गरजू असूनही २७ हजार ६००० कुटुंबधारकांना रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनही कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे नवीन कार्ड फोड करून पश्चात्ताप होत असल्याचे प्रतिक्रिया कुटुंबधारकांतून व्यक्त होत आहे.

कोट :- मला १५ वर्षांपूर्वी तलाठ्याकडून केसरी रेशन कार्ड मिळाले आहे. तेव्हापासून आजही रेशन धान्य मागण्यासाठी रेशन दुकानाला दर महिना जात असतो. केसरी कार्डला वरूनच धान्य आले नसल्याचे सांगितले जाते. मी टेम्पोचालक आहे. केवळ माझ्याकडे केसरी कार्ड आहे म्हणून धान्य मिळत नाही.

-शिवपुत्र रेऊरे, रामपूर

.........................

अन्नसुरक्षा योजनेमधून प्रत्येक गावातील कमी उत्पन्न घटकातील लोकांचे नावे ग्रामसभेत ग्रामपंचायतीने एकमताने ठराव करून तहसील कार्यालयाकडे पाठवून दिल्यास त्या यादीला मंजुरी देऊन त्यांना अन्नसुरक्षा योजनेचा फायदा देता येतो. तशा प्रत्येक गावातील अधिक अधिक ७६ टक्के लोकांना या योजनेत सहभाग करता येतो. यामुळे रेशन धान्याचा प्रश्न मार्गी लागते.

- बाळासाहेब शिरसट, तहसीलदार