शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाकडून २० तास तपासणी; सराफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहण्याचे आदेश अक्कलकोट : लाखो रुपयांचे चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून अक्कलकोटचे सराफ व्यापारी श्रेणिक कासार यास ...

कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहण्याचे आदेश

अक्कलकोट : लाखो रुपयांचे चोरीचे सोने घेतल्याच्या संशयावरून अक्कलकोटचे सराफ व्यापारी श्रेणिक कासार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील पोलिसांनी केली. दुसऱ्या आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत २० तास तपासणी करून पथक पुण्याकडे रवाना झाले. या सराफास बँक स्टेटमेंट घेऊन कोल्हापूरच्या कार्यालयास उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.

पुणे येथील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक मोठा दरोडा पडला होता. यात एका घरातील मोठे घबाड चोरीला गेले होते. या घटनेत अटकेत असलेल्या आरोपींनी चोरीचे सोन अक्कलकोट येथे विक्री केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून संबंधित आरोपीला शुक्रवारी दुपारी अक्कलकोट येथे आणण्यात आले. उत्तर पोलीस ठाण्यामार्फत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला बाजारपेठेत फिरविले. यावेळी त्याने श्रुती ज्वेलर्सचे दुकान दाखवले. त्यावरून दुकानाचे मालक श्रेणिक कासार यास ताब्यात घेऊन पुण्यास नेले आहे. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली. या पथकामध्ये एक अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी होते.

एकाच दिवशी सोने विकणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर वेगवेगळी कारवाई झाल्याने व्यापारी वर्गातून खळबळ उडाली आहे.

---

बँक स्टेटमेंट सादर करण्याचे आदेश

शुक्रवारी अक्कलकोट शहरातील आणखी एका ज्वेलर्स दुकानावर यांच्यावर आयकर विभागाची धाड पडली होती. तब्बल २० तास दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानदाराचे सीए व त्यांचे कायदेशीर सल्लागार वकील उपस्थित होते. सर्व कागदपत्रांची तपासणी करून हे पथक शनिवारी सकाळी ८ वाजता पुण्याकडे रवाना झाले. जाताना अभिनंदन यांना बँकेचे स्टेटमेंट घेऊन कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचे सांगण्यात आले.

---

नेहमीच त्रास, व्यापाऱ्यांची नाराजी

अक्कलकोट येथे लहान- मोठे असे मिळून तब्बल २५ ते २६ सोने-चांदीचे दुकानदार आहेत. त्यामध्ये मोठे ६ जण आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही जण नेहमी चोरीचे सोने, चांदी पारधी लोकांकडून घेतात, असा समज असला तरी अशा घटनेमुळे स्वच्छ, पारदर्शक व्यापार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना नेहमी त्रास होत असल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.