शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अडीच वर्षाचा मुलगा हरिपूरमधून बेपत्ता

By admin | Updated: August 2, 2014 00:20 IST

आईचा आक्रोश : पोलिसांत घेतली धाव

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बोंद्रे गल्लीतील अडीच वर्षाचा मुलगा खेळताना घरातून अचानक बेपत्ता झाला आहे. संस्कार राघवेंद्र नंदी असे या मुलाचे नाव आहे. आज (शुक्रवार) दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. संस्कारची आई संगीता या रात्री उशिरा नातेवाईकांसह सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यास आल्या होत्या.संगीता यांचे माहेर हरिपूर, तर बेळगाव सासर आहे. त्यांचे पती बेळगावातील एका फौंड्रीत नोकरीस आहेत. संगीता यांना महिन्यापूर्वी कावीळ झाली होती. पतीला पगार कमी असल्याने औषधोपचारासाठी पैसे कमी पडू लागले. यामुळे त्या हरिपुरात माहेरी आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांचा मुलगा संस्कार घरी खेळत होता. दीड वाजता संगीता यांनी त्याला जेवायला बोलाविले. तथापि तो आलाच नाही. त्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. यामुळे त्या त्याला बघण्यासाठी घरातून बाहेर आल्या. अंगणातही तो नव्हता. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. तथापि तो तिथेही नव्हता. त्याच्या शोधासाठी संपूर्ण हरिपूर गाव पालथे घालण्यात आले. सांगलीतील मुख्य बसस्थानक, रेल्वे स्टेशन यासह अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला; मात्र कोठेच सुगावा लागला नाही. रात्री उशिरा संगीता सांगली ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यास आल्या होत्या. त्यांच्यासोबत नातेवाईक मोठ्या प्रमाणात होते. लहान मुलगा हरविल्याचे सांगताना त्यांनी पोलीस ठाण्यातच आक्रोश सुरू केला. पोलिसांनी संस्कार बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. (प्रतिनिधी)पोलीस बेळगावला जाणारपोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव म्हणाले, संगीता व त्यांचा पती यांच्या कौटुंबिक कारणावरुन वाद आहे. या वादातून त्यांच्या पतीने मुलास नेले आहे का, याची प्रथम चौकशी केली जाणार आहे. तो ज्या फौंड्रीत कामाला आहे, तिथे तो आज कामावर होता का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक बेळगावला रवाना केले जाणार आहे. त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे.