शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

इफ्रा २ योजनेची कामे युध्दपातळीवर

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

केंद्र सरकारची योजना : संगमेश्वर तालुक्यातील प्रस्ताव मंजुरीला शासनाकडे सादर

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यासाठी केंद्र सरकारच्या ‘इफ्रा २’ या योजनेंअंतर्गत कामे करावीत अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर तालुक्यातील विविध शाखा अभियंता कार्यालयांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील जीर्ण झालेल्या उच्चदाब व लघुदाब विद्युत लाईन व ट्रान्सफार्मरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. या सर्व प्रक्रियेत बाजी मारली ती आरवली शाखा अभियंता कार्यालयाने. जीर्ण झालेल्या विद्युत लाईन बदलण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे.तालुक्यातील आरवली शाखा कार्यालयाने वर्षाअखेर ३० कि. मी. उच्चदाब विद्युत वाहिनी बदलण्याचे व लघु विद्युत वाहिनी अंतर्गत ६५ जीर्ण झालेले पोल बदलण्याचे लक्षही पूर्ण केले आहे. तसेच पाच नवीन ट्रान्सफॉर्मरही बदलले आहेत. आणखी जीर्ण झालेल्या ४ कि. मी. विद्युत वाहिनीचे काम प्रस्तावित असून, वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. पूर्ण करण्यात आलेल्या उच्चदाब वाहिनीचे काम भारत विकास व कंपनीकडे देण्यात आले आहे, तर लघुदाब वाहिनी पोल बदलण्याचे काम चिपळूण येथील प्रकाश इलेक्ट्रिकल कंपनी यांच्याकडे देण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखाणी व कुचांबे या मार्गावरील ११ केव्हीएची उच्चदाब विद्युत वाहिनी ही जुनी असल्याने या मार्गावरील कामाला महावितरणने प्राधान्य देत विद्युत वाहिनी बदलाच्या कामाला सुरुवात केली. या मार्गावरील एकूण १५ कि. मी. अंतरातील जीर्ण झालेले सर्व लोखंडी पोल बदलून त्या ठिकाणी नवीन सिमेंट पोल व नवीन वाहिनी टाकण्यात आली आहे. उच्चदाब वाहिनीचे काम हे कुंभारखाणीपर्यंत पूर्ण झाले असून, पुढील ४ कि. मी.चे कामही प्रगतीपथावर आहे. महावितरणने उच्चदाब वाहिनी बदलाबरोबरच लघुदाब वाहिनीला ही प्राधान्य दिले आहे. ग्रामीण जनतेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या लघुदाब विद्युत वाहिन्या बदलण्याचे काम सुरु केले आहे. रातांबी येथील २ कि. मी.चे काम सध्या सुरु आहे तर बुरंबाड आंबेश्वर मंदिर येथील १.२ कि. मी. वाहिनीचे काम पूर्णत्वास गेले आहे. कुंभारखाणी येथील १ कि. मी.च्या लघुदाब वाहिनीचे कामही पूर्ण झाले आहे. आरवली येथील विजेची वाढती गरज लक्षात घेता पूर्वी असलेला ६० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या ठिकाणी १०० केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. आरवलीप्रमाणे कोंडीवरे व बुरंबाड येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी या दोन्ही ठिकाणी ६० केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते. मात्र, आता याठिकाणी १०० केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहेत. आरवली बाटेवाडीत नवीन ट्रान्सफार्मर बसवावा अशी अनेक दिवसांची मागणी होती. येथील ग्रामस्थांच्या मागणीची महावितरणने दखल घेतली असून, १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर याठिकाणी बसवण्यात आला आहे. या कामामुळे परिसरातील वीज गायब होण्याचे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात होणार त्रासही कमी होणार आहे. (प्रतिनिधी)तहसीलदारांची गावभेट : नवीन विद्युत वाहिनीचा मुद्दाकुटगिरी येडगेवाडी येथे गेल्यावर्षी झालेल्या तहसीलदार यांच्या गावभेट कार्यक्रमात प्रामुख्याने रातांबी येथील नवीन विद्युत वाहिनीबाबतचा मुद्दा मांडला होता. या गावभेट कार्यक्रमात महावितरणचे आरवली शाखा अभियंता प्रकाश आखाडे हे उपस्थित होते. ग्रामस्थांनी मुद्दा मांडल्यानंतर याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून पाठपुरावा करुन हे काम करुन देतो असे आश्वासन दिले होते. या गावभेट कार्यक्रमाला कुटगिरीप्रमाणे रातांबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर आरवली शाखा अभियंत्यांनी हा प्रस्ताव तयार करून तो तत्काळ सादरही केला आहे.आरवली शाखेत अधिक कामेकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अधिकाधिक कामे आरवली शाखा कार्यालयाअंतर्गत होत असल्याने शाखा अभियंत्याने समाधान व्यक्त केले व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शाखा अभियंता कार्यालय हे नेहमीच तत्पर असेल. आवश्यक असणाऱ्या विद्युत वाहिनी बदलण्यासाठी मी स्वत: आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शाखा अभियंता प्रकाश आखाडे यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.