शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

पाडव्याचा मुहूर्त हुकणार?

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

संजय पानसरे : वाशी मार्केटमध्ये ७ हजार आंबा पेट्या रवाना

रत्नागिरी : दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात मुंबईतील मार्केटमध्ये विक्रीला जाणाऱ्या आंब्याचा मुहूर्त यावर्षी हुकणार असल्याचे दिसून येते. सध्या किरकोळ स्वरूपात आंबा मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील मिळून एकूण ७ हजार पेटी बुधवारी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक चांगली असल्याचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जानेवारी महिन्यापासून एखाद दुसरी किरकोळ आंबा पेटी मार्केटमध्ये विक्रीला येत आहे. दररोज आंबा विक्रीला येत असला तरी प्रमाण कमी आहे. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, पीक धोक्यात आले आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. गेले दोन दिवस कडकडीत ऊन पडत असले तरी हवेत मात्र गारवा आहे. त्यामुळे तुडतुडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भुरी तसेच तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून फवारणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.तयार आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. परंतु प्रमाण अल्प आहे. आंबा पेटीला सध्या २ ते ५ हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी अवकाळीमुळे बहुतांश पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. मुंबई शहरात आंब्याची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशातील भय्ये करतात. होळीचा सण साजरा झाल्यानंतर भय्ये मुंबईत दाखल होतात. त्यामुळे यावर्षी १५ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय २० मार्चपासून आंबा मार्केटमध्ये वाढण्याची अपेक्षा असल्याचे पानसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दरवर्षी पाडव्यानंतर आंब्याची आवक होते मोठ्या प्रमाणात.दररोज ५० हजारपेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस उपलब्ध होतात.अवकाळी पावसामुळे यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकणार ?अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम.तुडतुडा रोग वाढण्याची भीती.