शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पाडव्याचा मुहूर्त हुकणार?

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

संजय पानसरे : वाशी मार्केटमध्ये ७ हजार आंबा पेट्या रवाना

रत्नागिरी : दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात मुंबईतील मार्केटमध्ये विक्रीला जाणाऱ्या आंब्याचा मुहूर्त यावर्षी हुकणार असल्याचे दिसून येते. सध्या किरकोळ स्वरूपात आंबा मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील मिळून एकूण ७ हजार पेटी बुधवारी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक चांगली असल्याचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जानेवारी महिन्यापासून एखाद दुसरी किरकोळ आंबा पेटी मार्केटमध्ये विक्रीला येत आहे. दररोज आंबा विक्रीला येत असला तरी प्रमाण कमी आहे. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, पीक धोक्यात आले आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. गेले दोन दिवस कडकडीत ऊन पडत असले तरी हवेत मात्र गारवा आहे. त्यामुळे तुडतुडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भुरी तसेच तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून फवारणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.तयार आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. परंतु प्रमाण अल्प आहे. आंबा पेटीला सध्या २ ते ५ हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी अवकाळीमुळे बहुतांश पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. मुंबई शहरात आंब्याची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशातील भय्ये करतात. होळीचा सण साजरा झाल्यानंतर भय्ये मुंबईत दाखल होतात. त्यामुळे यावर्षी १५ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय २० मार्चपासून आंबा मार्केटमध्ये वाढण्याची अपेक्षा असल्याचे पानसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दरवर्षी पाडव्यानंतर आंब्याची आवक होते मोठ्या प्रमाणात.दररोज ५० हजारपेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस उपलब्ध होतात.अवकाळी पावसामुळे यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकणार ?अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम.तुडतुडा रोग वाढण्याची भीती.