शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

पाडव्याचा मुहूर्त हुकणार?

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

संजय पानसरे : वाशी मार्केटमध्ये ७ हजार आंबा पेट्या रवाना

रत्नागिरी : दरवर्षी गुढी पाडव्याला मोठ्या प्रमाणात मुंबईतील मार्केटमध्ये विक्रीला जाणाऱ्या आंब्याचा मुहूर्त यावर्षी हुकणार असल्याचे दिसून येते. सध्या किरकोळ स्वरूपात आंबा मुंबई मार्केटमध्ये दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील मिळून एकूण ७ हजार पेटी बुधवारी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आवक चांगली असल्याचे संजय पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जानेवारी महिन्यापासून एखाद दुसरी किरकोळ आंबा पेटी मार्केटमध्ये विक्रीला येत आहे. दररोज आंबा विक्रीला येत असला तरी प्रमाण कमी आहे. दरवर्षी गुढी पाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढते. दररोज ५० हजारापेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस दाखल होतात. मात्र, अवकाळी पावसामुळे यावर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, पीक धोक्यात आले आहे. फुलोऱ्यामध्ये पाणी साचल्याने कुजण्याबरोबर फळे गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय जो आंबा मोठा होता त्या आंब्यावर काळे डाग पडण्याबरोबर आंबा देठाजवळ कुजून गळण्याचा संभव आहे. गेले दोन दिवस कडकडीत ऊन पडत असले तरी हवेत मात्र गारवा आहे. त्यामुळे तुडतुडा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे भुरी तसेच तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी अजून फवारणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.तयार आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविण्यास सुरूवात केली आहे. परंतु प्रमाण अल्प आहे. आंबा पेटीला सध्या २ ते ५ हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी अवकाळीमुळे बहुतांश पीक नष्ट झाल्याने प्रमाण अल्प आहे. त्यामुळे दर टिकून राहील, अशी अपेक्षा आहे. मुंबई शहरात आंब्याची सर्वाधिक विक्री उत्तर प्रदेशातील भय्ये करतात. होळीचा सण साजरा झाल्यानंतर भय्ये मुंबईत दाखल होतात. त्यामुळे यावर्षी १५ मार्चपर्यंत येण्याची शक्यता आहे. शिवाय २० मार्चपासून आंबा मार्केटमध्ये वाढण्याची अपेक्षा असल्याचे पानसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दरवर्षी पाडव्यानंतर आंब्याची आवक होते मोठ्या प्रमाणात.दररोज ५० हजारपेक्षा अधिक आंबापेट्या विक्रीस उपलब्ध होतात.अवकाळी पावसामुळे यंदा गुढी पाडव्याचा मुहूर्त हुकणार ?अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर परिणाम.तुडतुडा रोग वाढण्याची भीती.