शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

ग्रामस्थ ठाम : काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये फरक नाही

राजापूर : यापूर्वीचे काँग्रेस सरकार आणि आताचे भाजप सरकार यांच्यामध्ये जराही फरक नाही. ते एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करायचा नाही, हेच दिसून येते. त्यामुळे प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार समस्त प्रकल्पविरोधकांनी नाटे येथे केला. प्रकल्पाविरोधातील मोर्चानंतर आयोजित सभेत ग्रामस्थांनी ही भूमिका मांडली. जनहक्कसमितीच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रकल्प विरोधकांचा मोर्चा साखरी नाटेमधील हुजरा भागापासून सुरू झाला. नाटे येथील तबरेज चौकापर्यंत बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, जनहक्कसमितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, सचिव व पं. स.चे सदस्य दीपक नागले, जि. प.चे सदस्य अजित नारकर, शीतल हर्डीकर, पर्यावरण तज्ज्ञ सत्यजित चव्हाण, शास्त्रज्ञ प्रदीप इंदूलकर, मंगेश चव्हाण, मन्सूर सोलकर, अलिमियाँ म्हसकर, मौलाना तालीब बांगी, नजीक तमके, सभापती कमलाकर कदम, विलास अवसरे, राजन कोंडेकर, पं. स. सदस्या रेखा कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे, रविकिरण तोरस्कर, विलास केरकर, अमिन हकीम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर यासहित परिसरातील बागायतदार मच्छिमार आणि तमाम प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तबरेज चौकात झालेल्या सभेत प्रकल्प हटविण्याबाबतचा निर्धार कायम असल्याचेच सर्व वक्त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. काँग्रेसप्रमाणेच या सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असे सांगताना त्यांनी आपला लढा कायम ठेवण्याचे आवाहन केले. शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात असल्याने नक्की हा प्रकल्प रद्द होईल, असा विश्वास मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी व्यक्त केला. यापूर्वी साखरी नाटेमध्ये आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे वचन दिले आहे. ते आपला शब्द नक्की पाळतील, अशी आशा बोरकर यांनी व्यक्त केली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)