शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

‘जैतापूर’विरुद्धचा संघर्ष कायम ठेवणार

By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST

ग्रामस्थ ठाम : काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये फरक नाही

राजापूर : यापूर्वीचे काँग्रेस सरकार आणि आताचे भाजप सरकार यांच्यामध्ये जराही फरक नाही. ते एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करायचा नाही, हेच दिसून येते. त्यामुळे प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार समस्त प्रकल्पविरोधकांनी नाटे येथे केला. प्रकल्पाविरोधातील मोर्चानंतर आयोजित सभेत ग्रामस्थांनी ही भूमिका मांडली. जनहक्कसमितीच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रकल्प विरोधकांचा मोर्चा साखरी नाटेमधील हुजरा भागापासून सुरू झाला. नाटे येथील तबरेज चौकापर्यंत बुलंद घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, जनहक्कसमितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, सचिव व पं. स.चे सदस्य दीपक नागले, जि. प.चे सदस्य अजित नारकर, शीतल हर्डीकर, पर्यावरण तज्ज्ञ सत्यजित चव्हाण, शास्त्रज्ञ प्रदीप इंदूलकर, मंगेश चव्हाण, मन्सूर सोलकर, अलिमियाँ म्हसकर, मौलाना तालीब बांगी, नजीक तमके, सभापती कमलाकर कदम, विलास अवसरे, राजन कोंडेकर, पं. स. सदस्या रेखा कोंडेकर, विभागप्रमुख राजा काजवे, रविकिरण तोरस्कर, विलास केरकर, अमिन हकीम, मच्छिमार नेते अमजद बोरकर, अलिमियाँ म्हसकर यासहित परिसरातील बागायतदार मच्छिमार आणि तमाम प्रकल्प विरोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तबरेज चौकात झालेल्या सभेत प्रकल्प हटविण्याबाबतचा निर्धार कायम असल्याचेच सर्व वक्त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली. काँग्रेसप्रमाणेच या सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असे सांगताना त्यांनी आपला लढा कायम ठेवण्याचे आवाहन केले. शिवसेना प्रकल्पाच्या विरोधात असल्याने नक्की हा प्रकल्प रद्द होईल, असा विश्वास मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी व्यक्त केला. यापूर्वी साखरी नाटेमध्ये आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे वचन दिले आहे. ते आपला शब्द नक्की पाळतील, अशी आशा बोरकर यांनी व्यक्त केली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)