शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

‘सुरक्षा रक्षक’ जबाबदारी कोणाची?

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : नोकरीसाठी गेले चार दिवस उपोषण सुरू

रजनीकांत कदम - कुडाळ -गेली अनेक वर्षे एमआयडीसीमध्ये सेवा बजावूनही नोकरी नोंदणीकृत नसल्याच्या कारणास्तव नाकारल्याने एमआयडीसीच्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी गेले चार दिवस आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या अवस्थेला एमआयडीसी प्रशासन की सुरक्षा रक्षक बोर्ड जबाबदार आहे, हा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे जुने सुरक्षा रक्षक व नवीन सुरक्षा रक्षक यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.कुडाळ एमआयडीसी ही प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे प्रश्न, समस्या, आजारी उद्योग यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. यावेळी एमआयडीसी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवरुन मोठा वाद निर्माण झाला असून गेली दहा ते बारा वर्षे याठिकाणी सेवा बजावलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना एमआयडीसीच्या सुरक्षा रक्षक बोर्डाने केवळ नोंदणीकृत नसल्याने नोकरीवरुन कमी करत त्या ठिकाणी नवीन सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे.गेली दहा बारा वर्षे केलेली सेवा, वाढते वय, कुटुंबाचा उदरनिर्वाह, त्यासाठी काढलेले कर्ज, तुटपुंज्या पगारात चालविण्यात येणारे घर, आजारपण, मुलांचे शिक्षण याची व्यवस्था करत असताना या सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागत असतानाच अचानकपणे नोकरीवरुन कमी व्हावे लागत असल्याने सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबावर मोठे आभाळच कोसळले आहे. कुडाळ एमआयडीसी येथे या अगोदर सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती गेली अनेक वर्षे करण्यात आली होती. आता एमआयडीसी प्रशासनाच्या नवीन ध्येयधोरणांनुसार या ठिकाणी कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. परंतु या भरतीमुळे अगोदर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मात्र नोकरी गमवावी लागली. गेली अनेक वर्षे येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केलेल्या व आता नोंदणीकृत नसल्यामुळे नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या या २० सुरक्षा रक्षकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाह कसा चालवायचा, अशी समस्या उभी आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी आमची सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करून घेऊन आम्हाला सेवेत घ्यावे, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हणत सोमवारी सकाळपासून कुडाळ एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. इतके वर्ष सेवा करुन आम्हालाच डावलण्यात आले. काहीजणांचे शासकीय नोकरीसाठी लागणारे वयही निघून गेल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळण्याचीही खात्री नाही. लेखी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणारइतकी वर्षे आम्ही येथे सेवा बजावून आमच्यावर ही पाळी येत आहे. आम्ही आता मागे हटणार नाही. जोपर्यंत आम्हाला एमआयडीसी प्रशासन नोकरीसंदर्भात लेखीपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आमरण उपोषण मागे घेणार नाही. येथील एमआयडीसी प्रशासनाच्या काहीशा चुकीमुळे भरतीसंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे आता या ठिकाणच्या स्थानिक सुरक्षारक्षकांना मात्र, उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.- उपोषणकर्ते,एमआयडीसी, कामगार कुडाळनेमकी चूक कोणाची?गेली दहा ते बारा वर्षे सेवा बजावलेल्या या स्थानिक सुरक्षा रक्षकांची केलेली भरतीही बेकायदेशीर आहे. कारण भरती करणाऱ्या सुरक्षारक्षक मंडळे बोर्डाची निर्मिती ३0 जुलै २0१४ रोजी झाली आहे. या मंडळाने नोंदणी शासन निर्णय २ मार्च २00९ नुसार केली पाहिजे होती. तसेच २५ आॅगस्ट २0१0 नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना सामावून घेतले पाहिजे. असे असताना मंडळाने एमआयडीसी १ एप्रिल २0१४ चे मागणी पत्र जे कोल्हापूर मंडळाला दिले होते. ते ग्राह्य मानने चुकीचे आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे रत्नागिरीतील तेरा सुरक्षारक्षक भरलेत. मात्र, सिंधुदुर्गमधील नाहीत.या सुरक्षा रक्षकांची भरती का नाही?दहा ते बारा वर्षे सेवा केलेल्या सुरक्षा रक्षकांची भरती का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हे सुरक्षा रक्षक विद्यांचल सुरक्षा रक्षक एजन्सीच्यावतीने याठिकाणी काम करत होते.यांची सुरक्षा रक्षक म्हणून एमआयडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र, ही नोंदणीकृत नसल्याने त्यांची या नोकरीत भरती होऊ शकली नाही, असे कारण एमआयडीसी प्रशासन देते. मात्र, याबाबत वस्तुस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे.ज्या एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक सेवा बजावत आहेत, त्यांनीच नोंदणीसाठी आपली नावे सुरक्षा रक्षक बोर्डाकडे पाठविण्याची गरज असते. कुडाळ एमआयडीसीचे अधिकारी आम्ही सुरक्षा रक्षक मंडळ बोर्डाकडे नोंदणी केल्याचे सांगत आहेत. मग या भरतीत या सुरक्षा रक्षकांना न घेता नवीन सुरक्षा रक्षकांची कशी भरती केली ? रत्नागिरी एमआयडीसीने सुरक्षा रक्षकांची नोंदणी बोर्डाकडे वेळीच केल्यामुळे तेथे हा प्रश्न नाही.