शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST

सतीश सावंत : शिवसेनेबाबत कायमच अवहेलना, दीपक केसरकरांना टोला

कणकवली : दहशतवादाच्या मुद्यावरून आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करीत आहेत. येथील विकासात अडथळा आणण्याचे काम आतापर्यंत त्यांनीच केले आहे असा आरोप करतानाच आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलणाऱ्या केसरकरांना नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर विनाकारण टीका करीत आहेत. भगवी टोळी म्हणून आतापर्यंत शिवसेनेची अवहेलना करणाऱ्या केसरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांवर नतमस्तक व्हावे असे आता वाटत आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी कधी साधी श्रद्धांजलीही त्यांना वाहिलेली नाही. आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलण्याची सवय केसरकर यांना आहे. १९९७ मध्ये नगराध्यक्ष तसेच २००९ मध्ये आमदार होण्यासाठी ते नारायण राणे यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. तर २००९ मध्येच प्रविण भोसलेंना डावलून आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याही चरणाशी ते नतमस्तक झालेले जनतेने पाहिले आहे. भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या चरणांशी नतमस्तक झालेले केसरकर जनतेला पहायला मिळतील. त्यांना जनतेबद्दल तसेच विकासाबाबत काहीही सोयरसुतक नाही. एक अकार्यक्षम आमदार म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने मंत्री करावे म्हणून नारायण राणे यांच्यावर यापूर्वी ते टीका करीत होते. त्यामुळे राणेंचे नाव न घेता केसरकर यांनी जिल्ह्यात राजकारण करून दाखवावे. तिलारी येथून सावंतवाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यात नळयोजनेद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला केसरकर यांनीच विरोध केला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपण पुन्हा निवडून येवू शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांची राणेंवर टीका सुरु आहे. शिवराम दळवी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आपल्याला पुन्हा आमदारकीचे तिकिट मिळणार नाही हे समजल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाच्या गोष्टी करणाऱ्या केसरकरांनी सावंतवाडीपुरता तरी शिवसेनेतला दहशतवाद प्रथम थांबवून दाखवावा. त्यांना दहशतवाद पहायचा असेल तर त्यांनी बेळगाव येथील येळ्ळूर येथे जावे. आपल्यामुळे शिवसेनेला लोकसभेत मताधिक्य मिळाल्याचा भ्रम त्यांना झाला असून हा भ्रमाचा भोपळा आगामी निवडणुकीत निश्चितच फुटेल असे सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)