शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वार्थासाठी दैवते बदलणाऱ्यांना टीकेचा काय अधिकार?

By admin | Updated: July 30, 2014 22:58 IST

सतीश सावंत : शिवसेनेबाबत कायमच अवहेलना, दीपक केसरकरांना टोला

कणकवली : दहशतवादाच्या मुद्यावरून आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करीत आहेत. येथील विकासात अडथळा आणण्याचे काम आतापर्यंत त्यांनीच केले आहे असा आरोप करतानाच आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलणाऱ्या केसरकरांना नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला आहे. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, दीपक केसरकर नारायण राणे यांच्यावर विनाकारण टीका करीत आहेत. भगवी टोळी म्हणून आतापर्यंत शिवसेनेची अवहेलना करणाऱ्या केसरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांवर नतमस्तक व्हावे असे आता वाटत आहे. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी कधी साधी श्रद्धांजलीही त्यांना वाहिलेली नाही. आपल्या स्वार्थाप्रमाणे दैवते बदलण्याची सवय केसरकर यांना आहे. १९९७ मध्ये नगराध्यक्ष तसेच २००९ मध्ये आमदार होण्यासाठी ते नारायण राणे यांच्यासमोर नतमस्तक झाले होते. तर २००९ मध्येच प्रविण भोसलेंना डावलून आपल्याला आमदारकी मिळावी यासाठी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याही चरणाशी ते नतमस्तक झालेले जनतेने पाहिले आहे. भविष्यात आदित्य ठाकरे यांच्या चरणांशी नतमस्तक झालेले केसरकर जनतेला पहायला मिळतील. त्यांना जनतेबद्दल तसेच विकासाबाबत काहीही सोयरसुतक नाही. एक अकार्यक्षम आमदार म्हणूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने मंत्री करावे म्हणून नारायण राणे यांच्यावर यापूर्वी ते टीका करीत होते. त्यामुळे राणेंचे नाव न घेता केसरकर यांनी जिल्ह्यात राजकारण करून दाखवावे. तिलारी येथून सावंतवाडी, मालवण, कुडाळ या तालुक्यात नळयोजनेद्वारे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला केसरकर यांनीच विरोध केला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपण पुन्हा निवडून येवू शकत नाही हे माहित असल्यानेच त्यांची राणेंवर टीका सुरु आहे. शिवराम दळवी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आपल्याला पुन्हा आमदारकीचे तिकिट मिळणार नाही हे समजल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवादाच्या गोष्टी करणाऱ्या केसरकरांनी सावंतवाडीपुरता तरी शिवसेनेतला दहशतवाद प्रथम थांबवून दाखवावा. त्यांना दहशतवाद पहायचा असेल तर त्यांनी बेळगाव येथील येळ्ळूर येथे जावे. आपल्यामुळे शिवसेनेला लोकसभेत मताधिक्य मिळाल्याचा भ्रम त्यांना झाला असून हा भ्रमाचा भोपळा आगामी निवडणुकीत निश्चितच फुटेल असे सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)