शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

जलशुध्दिकरण कचऱ्यात!

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

पाणी शुद्धतेबाबात प्रश्नचिन्ह : साळवी स्टॉपचा कचरा प्रश्न चिघळणार

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचऱ्याच्या ढिगांमध्ये जलशुध्दिकरण प्रक्रिया होत असून, रत्नागिरीकरांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुध्दतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरातील या कचऱ्याच्या दुर्गंधीने व ढीग दररोज पेटवून दिले जात असल्याने नागरिकांना जगणे कठीण बनले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास कचरा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरातील दररोज संकलित होणारा कचरा गेल्या काही वर्षांपासून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधी व धुराचा फटका बसत आहे. संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचे हे ठिकाण बदलावे व अन्यत्र कचरा टाकला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी स्थानिकांचा हा प्रश्न नेटाने लावून धरला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या सभेतही आवाज उठविला असून, तत्काळ या कचरा डंपिंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रत्नागिरीची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी असल्याने हजारो लोक रोज शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज पालिकेच्या कचरा वाहनांमधून २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. हा सर्व कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचरा समस्येबाबत नगरपरिषदेने मार्ग न काढल्यास येत्या पंधरवड्यात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)दहा वर्षांपूर्वी निर्देश : घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडेसाळवी स्टॉप येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नगरपरिषदेने उभारावा, असे निर्देश शासनाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, जागा मिळत नसल्याने या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. दांडेआडोमच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावालाही जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प करावा कुठे, असा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासनापुढेही उभा ठाकला आहे. याबाबत पालिकेतील नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हात वर केले असून, ही समस्या सुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची घुसमटशहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे टाकण्यात येणारा कचरा सायंकाळच्या वेळेत जाळण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सायंकाळी या ठिकाणाहून जाताना नागरिकांची घुसमट होते, तरीदेखील प्रशासन ढिम्म आहे, याचे आश्चर्य आहे.