शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलशुध्दिकरण कचऱ्यात!

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

पाणी शुद्धतेबाबात प्रश्नचिन्ह : साळवी स्टॉपचा कचरा प्रश्न चिघळणार

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचऱ्याच्या ढिगांमध्ये जलशुध्दिकरण प्रक्रिया होत असून, रत्नागिरीकरांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुध्दतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरातील या कचऱ्याच्या दुर्गंधीने व ढीग दररोज पेटवून दिले जात असल्याने नागरिकांना जगणे कठीण बनले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास कचरा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरातील दररोज संकलित होणारा कचरा गेल्या काही वर्षांपासून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधी व धुराचा फटका बसत आहे. संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचे हे ठिकाण बदलावे व अन्यत्र कचरा टाकला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी स्थानिकांचा हा प्रश्न नेटाने लावून धरला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या सभेतही आवाज उठविला असून, तत्काळ या कचरा डंपिंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रत्नागिरीची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी असल्याने हजारो लोक रोज शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज पालिकेच्या कचरा वाहनांमधून २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. हा सर्व कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचरा समस्येबाबत नगरपरिषदेने मार्ग न काढल्यास येत्या पंधरवड्यात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)दहा वर्षांपूर्वी निर्देश : घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडेसाळवी स्टॉप येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नगरपरिषदेने उभारावा, असे निर्देश शासनाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, जागा मिळत नसल्याने या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. दांडेआडोमच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावालाही जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प करावा कुठे, असा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासनापुढेही उभा ठाकला आहे. याबाबत पालिकेतील नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हात वर केले असून, ही समस्या सुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची घुसमटशहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे टाकण्यात येणारा कचरा सायंकाळच्या वेळेत जाळण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सायंकाळी या ठिकाणाहून जाताना नागरिकांची घुसमट होते, तरीदेखील प्रशासन ढिम्म आहे, याचे आश्चर्य आहे.