शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

जलशुध्दिकरण कचऱ्यात!

By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST

पाणी शुद्धतेबाबात प्रश्नचिन्ह : साळवी स्टॉपचा कचरा प्रश्न चिघळणार

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचऱ्याच्या ढिगांमध्ये जलशुध्दिकरण प्रक्रिया होत असून, रत्नागिरीकरांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुध्दतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरातील या कचऱ्याच्या दुर्गंधीने व ढीग दररोज पेटवून दिले जात असल्याने नागरिकांना जगणे कठीण बनले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास कचरा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरातील दररोज संकलित होणारा कचरा गेल्या काही वर्षांपासून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधी व धुराचा फटका बसत आहे. संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचे हे ठिकाण बदलावे व अन्यत्र कचरा टाकला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. आता या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी स्थानिकांचा हा प्रश्न नेटाने लावून धरला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या सभेतही आवाज उठविला असून, तत्काळ या कचरा डंपिंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. रत्नागिरीची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी असल्याने हजारो लोक रोज शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज पालिकेच्या कचरा वाहनांमधून २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. हा सर्व कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचरा समस्येबाबत नगरपरिषदेने मार्ग न काढल्यास येत्या पंधरवड्यात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)दहा वर्षांपूर्वी निर्देश : घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडेसाळवी स्टॉप येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नगरपरिषदेने उभारावा, असे निर्देश शासनाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, जागा मिळत नसल्याने या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. दांडेआडोमच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावालाही जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प करावा कुठे, असा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासनापुढेही उभा ठाकला आहे. याबाबत पालिकेतील नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हात वर केले असून, ही समस्या सुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची घुसमटशहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे टाकण्यात येणारा कचरा सायंकाळच्या वेळेत जाळण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सायंकाळी या ठिकाणाहून जाताना नागरिकांची घुसमट होते, तरीदेखील प्रशासन ढिम्म आहे, याचे आश्चर्य आहे.