शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पाणीप्रश्नी सर्व पक्ष एकवटणार

By admin | Updated: October 19, 2015 22:38 IST

आज बैठक : पाण्याचा थेंब न देण्याचा निर्धार

नाशिक : गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा असूनही नाशिककरांनी भविष्याची चिंता वाहत पाणीकपातीचा स्वीकार केला आहे. नाशिककर आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोणत्याही परिस्थितीत गंगापूर धरणातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. दरम्यान, उद्भवलेल्या पाणीप्रश्नी सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि. २०) महापालिकेत सेना गटनेता कार्यालयात दुपारी ४ वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विरोध दर्शवित अजय बोरस्ते यांनी सांगितले की, गंगापूर धरणात आजमितीला ७० टक्के पाणीसाठा आहे. नाशिक महापालिकेने भविष्यात कमी होणारा पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि नाशिककरांनीही मोठ्या मनाने पाणीकपातीच्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे. परंतु, सरकार नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. शहरात वर्षभर सिंहस्थ कुंभमेळा सुरू राहणार आहे. कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या तिथींना लाखो भाविक शहरात येत आहेत. त्यासाठीही पाणी आरक्षण आहे. अशा स्थितीत धरणातील पाणी वहन मार्गाने नेऊन वाया जाऊ दिले जाणार नाही. शिवसेना त्याविरोधात आक्रमक भूमिका घेईल. ज्या कुणी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवालही बोरस्ते यांनी केला. दरम्यान, या पाणीवाटपाबाबत सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक मंगळवारी बोलाविण्यात आली असून, त्यात आंदोलनाची पुढील रुपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.