शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

पाणी उशाशी...तरीही तहान मात्र घशाशी

By admin | Updated: December 13, 2015 01:12 IST

शासनाच्या उदासिनतेने जमिनी ओसाडच : तिलारी प्रकल्पाचा दोडामार्गसाठी वापर अत्यल्पच

वैभव साळकर ल्ल दोडामार्ग तिलारी प्रकल्पाचे लाखो घनलिटर पाणी दरदिवशी गोव्याच्या दिमतीला धावत असून ते गोवा राज्यासाठी संजीवनी ठरले आहे. मात्र, दोडामार्ग तालुक्यात या पाण्याचा उपयोग फारच अत्यल्प प्रमाणात होताना दिसत आहे. वास्तविक पाहता हा प्रकल्प तालुक्यात असल्याने येथील शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होणे अपेक्षित असताना पाणीवापर संस्था स्थापन करण्यात शासनाची असलेली उदासिनता आणि प्रकल्पाकडून आकारली जाणारी भरमसाठ पाणीपट्टी या कारणांमुळे या पाण्याचा वापर तालुक्याला हवा तेवढा होताना दिसत नाही. त्यामुळे पाणी उशाशी पण तहान घशाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर या पाण्याचा शंभर टक्के वापर अल्पावधीतच होईल. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी प्रकल्प साकारला आहे. जवळपास दीड हजार कोटी रूपयांचा टप्पा ओलांडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. प्रकल्पाच्या खर्चात ७६ टक्के वाटा गोव्याचा तर २४ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. साहजीकच तिलारी प्रकल्पाचे पाणी गोव्याला अधिक प्रमाणात देणे क्रमप्राप्त आहे. एकूण १६ टिमसी पाणीसाठा असलेल्या या प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी डावा व उजवा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे गोव्यात डिचोली तालुक्यात सोडले जाते. तर तेरवण-मेढे-उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी उजव्या कलव्याद्वारे पेडणे तालुक्यात सोडले जाते. डावा कालवा हा तालुक्यातील खानयाळे, साटेली-भेडशी, बोदडे, कुडासे, आंबेली, कसई-दोडामार्ग, या गावातून जातो. तर उजवा कालवा घोटणेवाडी, घोटगे परमे, कुडासे, सासोली येथून जात गोव्यात पेडणे तालुक्यात हणखणे याठिकाणी प्रवेश करतो. साहजिकच ज्या-ज्या गावातून हे दोन्ही कालवे गेले आहेत. त्या-त्या ठिकाणचे क्षेत्र प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येते. मात्र, सासोली, घोटगेवाडी व घोटणे-परमे या चार गावातील काही मोजक्याच ठिकाणी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. उर्वरित ठिकाणी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. उर्वरीत ठिकाणी मात्र तिलारी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या आजूबाजूच्या अनेक जमिनी पाण्याची उपलब्धता असतानासुद्धा पडीक दिसतात. अगदी या उलट गोवा राज्याला हेच पाणी वरदान ठरले असून त्याठिकाणी तिलारीच्या पाण्यावरच कृषीक्रांती झाली आहे. डिचोली व पेडणे तालुक्यात प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग तेथील शेतकऱ्यांनी उन्हाळी वायंगणी भातशेती करण्यासाठी पुरेपूर केला आहे. काही वर्षापूर्वी ज्या ठिकाणी ओसाड जमिनी होत्या, त्या आता ओलिताखाली आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त या पाण्याचा उपयोग उद्योगधंद्यासाठी देखील होऊ लागल्याने गोवा राज्यासाठी तिलारी प्रकल्प संजीवनी देणारा ठरला आहे. गंभीर अवस्था : शेतकऱ्यांना फायदा नाही ४गोव्यात तिलारीच्या पाण्याचा दर तेथील जलसंपदा खात्याने अल्पप्रमाणात आकारला आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी झाला आहे. याउलट दोडामार्ग तालुक्यात वेगळे चित्र आहे. पाणीवापर संस्था स्थापन करण्यात शेतकरी पुढे येत नसल्याने आणि प्रकल्पाची पाणीपट्टी चढत्या दराने आकारली जात असल्याने पाण्याचा आवश्यक तेवढा वापर होत नाही. साहजिकच हा प्रकल्प तालुक्यात असूनसुद्धा त्याचा फायदा शेतकरी वर्ग उठवू शकत नाही. त्यामुळे पाणी एकच पण गोव्यात त्याचा दर कमी पण तालुक्यात मात्र महाग अशी गंभीर अवस्था येथे पहावयास मिळते.