शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

कचरा व्यवस्थापनाची गरज

By admin | Updated: November 3, 2014 23:24 IST

सावंतवाडीत रोगराईची भीती : डेपोतील कचरा रस्त्यावर

सावंतवाडी : येथील लाडाची बाग परिसरातील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले असून सर्व कचरा आणि घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. त्यामुळे जवळपासच्या वाड्यातील घरांमध्ये रोगराई व साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कचऱ्याच्या साठ्यामुळे डासांची पैदास होऊन तापसरीची लागण या परिसरात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या कचरा व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बेळगाव-सावंतवाडी या मार्गावर हा कचरा डेपो आहे. बरेच पर्यटक पर्यटनासाठी सावंतवाडी तालुक्यात येतात. यावेळी त्यांना परिसरातील कचरा आणि घाणीचा त्रास सहन करावा लागतो. पूर्ण प्रवास संपेपर्यंत हा वास नाकामधून जात नसल्याची तक्रार वाहनचालकांची आहे. या कचरा डेपोच्या दरवाज्यावर आणि बाहेरही कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. हा कचरा वाऱ्यामुळे तसेच अन्य कारणांनी मुख्य रस्यावर येतो. त्यामुळे या भागातून प्रवास करणारी वाहने अथवा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. संपूर्ण सावंतवाडीतील कचरा या कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे डेपोत कचऱ्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामुळे कचरा कुजतो. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या रुतण्याच्या भीतीने डेपोमध्ये घातल्या जात नाहीत. परिणामी कचरा डेपोच्या दरवाज्यावरच फेकला जातो. यामुळे डेपोच्या दरवाज्यावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा जेसीबी सारख्या यंत्रानेच बाजूला करणे योग्य ठरेल. यासाठी संबंधित विभागाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करून संभाव्य धोके टाळण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे. साथरोगांचा प्रादुर्भाव शक्यकचरा डेपोतील अस्ताव्यस्त पडलेला आणि मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच ओढ्यातून नदीला मिळणारे सांडपाणी यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. काहीगावांमध्ये साथरोगाचे रूग्ण सापडले आहेत. काही रुग्ण दगावल्याचीही उदाहरणे आहेत. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)शेतीला सांडपाण्यापासून धोकाया कचरा डेपोलगत असलेल्या ओढ्यामध्ये सावंतवाडीतील सांडपाणी सोडले जाते. या ओढ्याचे पाणी नदीपात्राला जाऊन मिळते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या कारिवडे, माडखोल आदी गावातील शेतीला या सांडपाण्यापासून धोका पोहोचू शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरांनाही पिण्यासाठी या नदीतील पाणी दिले जाते. त्यामुळे शहरातील सांडपाणी नदीत न सोडता अन्य ठिकाणची त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.