शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
4
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
5
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
6
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
7
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
8
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
9
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
10
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
12
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
13
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
14
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
15
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
16
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
17
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
18
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
19
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
20
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली

कचरा व्यवस्थापनाची गरज

By admin | Updated: November 3, 2014 23:24 IST

सावंतवाडीत रोगराईची भीती : डेपोतील कचरा रस्त्यावर

सावंतवाडी : येथील लाडाची बाग परिसरातील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले असून सर्व कचरा आणि घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. त्यामुळे जवळपासच्या वाड्यातील घरांमध्ये रोगराई व साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कचऱ्याच्या साठ्यामुळे डासांची पैदास होऊन तापसरीची लागण या परिसरात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या कचरा व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बेळगाव-सावंतवाडी या मार्गावर हा कचरा डेपो आहे. बरेच पर्यटक पर्यटनासाठी सावंतवाडी तालुक्यात येतात. यावेळी त्यांना परिसरातील कचरा आणि घाणीचा त्रास सहन करावा लागतो. पूर्ण प्रवास संपेपर्यंत हा वास नाकामधून जात नसल्याची तक्रार वाहनचालकांची आहे. या कचरा डेपोच्या दरवाज्यावर आणि बाहेरही कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. हा कचरा वाऱ्यामुळे तसेच अन्य कारणांनी मुख्य रस्यावर येतो. त्यामुळे या भागातून प्रवास करणारी वाहने अथवा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. संपूर्ण सावंतवाडीतील कचरा या कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे डेपोत कचऱ्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामुळे कचरा कुजतो. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या रुतण्याच्या भीतीने डेपोमध्ये घातल्या जात नाहीत. परिणामी कचरा डेपोच्या दरवाज्यावरच फेकला जातो. यामुळे डेपोच्या दरवाज्यावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा जेसीबी सारख्या यंत्रानेच बाजूला करणे योग्य ठरेल. यासाठी संबंधित विभागाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करून संभाव्य धोके टाळण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे. साथरोगांचा प्रादुर्भाव शक्यकचरा डेपोतील अस्ताव्यस्त पडलेला आणि मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच ओढ्यातून नदीला मिळणारे सांडपाणी यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. काहीगावांमध्ये साथरोगाचे रूग्ण सापडले आहेत. काही रुग्ण दगावल्याचीही उदाहरणे आहेत. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)शेतीला सांडपाण्यापासून धोकाया कचरा डेपोलगत असलेल्या ओढ्यामध्ये सावंतवाडीतील सांडपाणी सोडले जाते. या ओढ्याचे पाणी नदीपात्राला जाऊन मिळते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या कारिवडे, माडखोल आदी गावातील शेतीला या सांडपाण्यापासून धोका पोहोचू शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरांनाही पिण्यासाठी या नदीतील पाणी दिले जाते. त्यामुळे शहरातील सांडपाणी नदीत न सोडता अन्य ठिकाणची त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.