शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

विकासासाठी मतदार मनसेच्या पाठी उभे राहतील

By admin | Updated: April 2, 2016 00:11 IST

धीरज परब यांचा विश्वास : कुडाळचा नगराध्यक्ष मनसेच ठरविणार, आघाडी, युतीकडून यापूर्वी लोकांचा भ्रमनिरास--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ  ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये या अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी व त्यांच्या आघाडी व युती यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या या शहरात हवा तसा विकास आणि नागरी सुविधा ते देवू शकले नाहीत. त्यामुळे कुडाळचा सर्वांगीण विकास होण्यासाठी यावेळी कुडाळचे मतदार हे मनसेच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच कुडाळचा नगराध्यक्ष हा मनसेच ठरविणार असेही सांगितले.परब म्हणाले की, कुडाळ नगरपंचायत होण्याअगोदर या ठिकाणी ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीवर काँग्रेस, शिवसेना भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी अनेकदा सत्ता उपभोगली. मात्र, कुडाळचा हवा तसा विकास यांच्यापैकी कोणीच केला नाही. ते नागरी सुविधाही देवू शकले नाहीत. कुडाळ शहरातील तिघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी कुडाळचा विकास केला नाही. कुडाळमधील युती आणि आघाड्यांमधील स्थानिक नेतृत्वांचे पक्ष बदलले परंतु चेहरे तेच राहिले आहेत. त्यामुळे त्याच- त्याच नेतृत्वाकडून जनतेने काय अपेक्षा ठेवाव्यात हा प्रश्न जनतेस पडला आहे. आणि म्हणूनच येथील शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, जनतेला नागरीसुविधा देण्यासाठी या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे. यापूर्वीच मनसेने जनतेस आवाहन केले होते की, कुडाळच्या विकासासाठी चांगले प्रशासन, चांगल्या सुविधा व नियोजनबद्ध विकासकामे व्हावीत याकरिता सेवाभावी व्यक्तींनी पुढे यावे, त्यांच्या पाठीशी मनसे खंबीर राहील. या आवाहनाप्रमाणे आमच्या पक्षाच्यावतीने उभे करण्यात आलेले उमेदवार हे सेवाभावी वृत्तीचे, जनतेच्या समस्यांची जाण असणारे, सुशिक्षित, जनसंपर्क व जनहितासाठीच झटणारे व भ्रष्टाचारात न बरबटलेले असे उमेदवार दिले आहेत. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारात अडकलेली असून भाजप व शिवसेना राज्यापासून ते केंद्रापर्यंत श्रेयवादासाठी भांडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वासच उडालेला आहे. मनसे नेहमीच मराठी तरुणांच्या रोजगारासाठी, मराठी माणसांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. मनसेचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून कुडाळवासीयांना चांगल्या सुविधा, प्रशासन व नियोजनबद्ध विकासकामे निश्चितच करण्यात येतील. यामध्ये नागरी सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, बंद गटार, ड्रेनेज साफसफाई, शाळा, दवाखाना, रस्ते, आरोग्य तसेच अन्य महत्त्वपूर्ण कामे करून कुडाळ शहर आदर्श शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी आतापर्यंत जनतेला आश्वासने देण्याचे काम केले. त्यामुळे लोक कंटाळले असल्याचेही धीरज परब यांनी सांगितले. राणेंवर जबाबदारी सोपवतीलया निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होवून जनहित हेच एकमेव ध्येय घेवून उमेदवार निवडणूक लढवीत असून सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील व विद्यमान नगराध्यक्ष निवडीच्या चाव्या मनसेच्या हाती राहतील, असा ठाम विश्वास आम्हाला आहे.- धीरज परब, मनसे, जिल्हाध्यक्ष