शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

भाजीपाला,फळा-फुलांना मागणी

By admin | Updated: August 25, 2014 22:13 IST

गणेशोत्सवाची चाहूल : भाव गगनाला भिडले, चाकरमान्यांची हजेरी

अयोद्याप्रसाद गावकर - पुरळ --गणेश चतुर्थीच्या तोंडावर फळे व भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. या उत्सवामध्ये फळांना फार महत्त्व आहे. सध्या बाजारपेठांमध्ये सफरचंद, डाळींब, चिकू, पेरू, केळी, मोसंबी, संत्री येऊ लागले असून त्यांचे भावही गगनाला भिडल्यासारखे आहे. सफरचंदचा भाव १६० रूपये प्रतिकिलो आहे. याच सफरचंदचा भाव महिन्यापूर्वी १०० ते १२० रूपये होता. तसेच स्थानिक लोकांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या पडवळ, काकडी, चिबुड, भेंडी आदी फळभाज्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. गणेशाच्या आगमनाला काही दिवसच राहिल्याने बाजारपेठांमध्ये ही फळे व भाज्या दाखल झाल्याने खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची चाहूल लागल्यासारखी आहे.देवगड तालुक्यामध्ये बहुतांश लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी भात व नाचणी शेती करतात. यातूनच बहुतांश शेतकरी हे आपल्या परसबाग व शेतामध्ये काकडी, चिबुड, पडवळ, भेंडी यांचीही लागवड करतात. ही लागवड विशेष करून गणेशोत्सवांमध्ये नैवेद्यामध्ये तरतूद करण्यासाठीच करीत असल्याचे दिसत आहे. देवगड, तळेबाजार, शिरगाव, मिठबाव, पडेल, विजयदुर्ग, फणसगाव या तालुक्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये परजिल्ह्यातून व्यापारी आठवडा बाजाराला येऊन प्रचंड प्रमाणात फळांची विक्री करीत आहेत. तसेच गणेशोत्सवामध्ये बाजारपेठांमध्ये या कालावधीमध्ये फळे विकतात. या फळांचा भाव हे परजिल्ह्यातील व्यापारी येथील ग्राहकांची पिळवणूक करून १०० ते १२० रूपये किलोने विकली जाणारी फळे १६०, १८० प्रतिकिलोने विकली जात आहेत. आठवड्याच्या बाजारामध्ये तालुक्यामधील व्यापारी हे ९० टक्के कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातीलच असल्याचे आढळून येतात. स्थानिक व्यापाऱ्यांची याबाबत उदासिनता असल्याचेही दिसते.गणेशोत्सवामध्ये स्थानिकांनी स्वत:च्या बागायतींमध्ये लागवड करून जशी फळभाज्यांची पिके घेतात आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये विकतात, यामुळे योग्य किंमतीत भाज्या विकून हे व्यापारी आपला व्यवसाय करतात. अशाच पद्धतीने आठवड्याच्या बाजारामध्ये अन्य फळे, साहित्यांची विक्री केल्यास स्थानिकांच्या हाती पैसा येऊन रोजगार निर्माण होऊन परजिल्ह्यात जाणारा पैसा स्थानिकांच्या हाती राहिल्याने आर्थिक सुबत्ता येण्यास वेळ लागणार नाही. सध्या गणेशात्सवाच्या निमित्ताने या गोष्टी येथील व्यापाऱ्यांनी आत्मसात करणेही गरजेचे आहे.मुंबईकरांच्या आगमनाला सुरूवात झाली असून काही चाकरमानी गावी येऊनच स्थानिक बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाची खरेदी करतात. यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये गणेशोत्सव कालावधीमध्ये लाखो रूपयांची उलाढाल होत असते. गणेशाचे साहित्य, फळे, भाज्या, कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. अशा या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक राहिल्याने उत्सुकता शिगेला पोहोचल्याने अखेरची खरेदी करतानाही गणेशभक्त दिसत आहेत. गणेशोत्सवामध्ये नैवेद्यामध्ये मोदक, पुजेमध्ये दुर्वा, फुलांमध्ये लाल जास्वंद, तसेच भजन महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.