शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरणतर्फे राज्यस्तरीय विविध स्पर्धा

By admin | Updated: September 21, 2015 23:42 IST

पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम : प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला, ३0 सप्टेंबरपर्यंत मुदत

ओरोस : सामाजिक वनीकरण महासंचालनालय महाराष्ट्र, पुणेतर्फे माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसेच राज्यपातळीवर सर्वांसाठी खुली छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्याचे प्रथम व व्दितीय क्रमांकांच्या प्रवेशिकांचे राज्यस्तरावर परीक्षण होणार असून, त्यातून राज्यस्तरीय विजेते निश्चित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्राथमिक गट - चौथी ते सातवी, माध्यमिक गट - आठवी, दहावी आणि महाविद्यालयीन गट - ११ वी व पुढे असे गट आहेत. महाविद्यालयीन गटासाठी ‘बदललेल्या ऋतुचक्राचे परिणाम’ आकार ५६ से. मी. बाय २५ से. मी. साहित्य वॉटर कलर, पोस्टर कलर, आॅईल कलर. वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गटासाठी विषय : ‘पर्यावरण स्नेही जीवन शैली’, वेळ : दहा मिनिटे. महाविद्यालयीन गटासाठी विषय : ‘जल प्रदूषणाची समस्या व त्यामवरील उपाय’ वेळ : १० मिनिटे. राज्यस्तरीय खुली छायाचित्र विषय : ‘हरित टेकडी’ आकार २५ से. मी. बाय २० से. मी., महाविद्यालयीन गटासाठी (इ. अकरावी पुढे). जिल्हास्तर स्पर्धेचे नाव, निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ५०० रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय १०० रुपये. राज्यस्तत्र निबंध व चित्रकला प्रथम १००० रुपये, द्वितीय ६०० रुपये, तृतीय ४०० रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.माध्यमिक गटासाठी (आठवी, दहावी) जिल्हास्तर स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ५०० रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय २०० रुपये. राज्यस्तर निबंध व चित्रकला प्रथम ७०० रुपये, द्वितीय ५०० रुपये, तृतीय ३०० रुपये. प्राथमिक गटासाठी विषय चित्रकला जिल्हास्तर प्रथम १५० रुपये, द्वितीय १00 रुपये, तृतीय ७५ रुपयांचे पारितोषिक ठेवले आहे.राज्यस्तर स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ४00 रुपये, द्वितीय ३०० रुपये, तृतीय २०० रुपये सर्वांसाठी खुल्या गटासाठी राज्यस्तर विषय खुली छायाचित्र स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेचे नाव निबंध, चित्रकला, वक्तृत्व प्रथम ३००० रुपये, द्वितीय २००० रुपये, तृतीय १००० रुपये राज्यस्तरीय खुल्या छायाचित्र (फोटोग्राफी स्पर्धा) स्पर्धेसाठीच्या छायाचित्रास सुयोग्य शीर्षक देणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येकी ५०० रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देणार आहेत. शाळा, विद्यालये आणि महाविद्यालय प्रमुखांनी निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येकी प्रथम तीन क्रमांकाची चित्रे व निबंध शिफारशीसह संबंधित जिल्ह्याचे उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवायचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील निबंध व चित्रकला स्पर्धेच्या प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या प्रवेशिका उपसंचालकांनी दिनांक १५ सप्टेंबर २0१५ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन उपसंचालक सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. प्राथमिक गटासाठी फक्त चित्रकला स्पर्धा, तर माध्यामिक व महाविद्यालयीन गटांसाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. निबंध स्पर्धेसाठी माध्यमिक गटास ‘स्वच्छता अभियानात माझी भूमिका’ हा विषय देण्यात आला असून शब्द मर्यादा ६०० शब्दांची आहे. महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’ हा विषय असून, १०० शब्दांत निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी प्राथमिक गटास ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’ या विषयावर ३५ से. मी. बाय २८ से. मी. चित्र काढायचे आहे. माध्यमिक गटासाठी ‘माझी हरित शाळा’ हा विषय आहे. आकार ३५ से. मी. बाय २८ से. मी. साहित्य वॉटर, कलर पेन्सिल, स्केच पेन वापरायचे आहे.