शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट, सोशल मीडिया जपून वापरा

By admin | Updated: December 25, 2015 00:03 IST

हेमंतकुमार शहा : आनंदीबाई महाविद्यालयात ‘सायबर क्राईम’बाबत मार्गदर्शन

वैभववाडी : इंटरनेट, मोबाईल आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सायबर क्राईमची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर डोकेदुखी ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग जेवढा चांगल्यासाठी होतो, त्याहून भयंकर दुष्परिणाम गैरवापरामुळे भोगावे लागतात. त्यामुळे सायबर क्राईम रोखण्यासाठी युवा पिढीने इंटरनेट व सोशल मीडियाचा जपून वापर करावा, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी येथील आनंदीबाई महाविद्यालयात केले. पोलीस खात्यामार्फत येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अविनाश पालवे, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक आर. डी. गुरव, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आदी उपस्थित होते. शहा म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्याला व पोलीस समाज घडवत असतो. त्यामुळे विद्यार्थिदशेत एकदा चुकले तर पुढे सगळे चुकत जाते. सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल केली तर जीवन चांगले घडते. इंटरनेट, मोबाईल काळाची गरज आहे; परंतु त्याचे दुष्परिणामही जाणून घेण्याची गरज आहे. सोशल नेटवर्किंगचा योग्य उपयोग केला नाही, तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आपण टाकलेल्या पोस्टमुळे एखाद्याची बदनामी होऊ शकते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी त्याच्या गैरवापराचे दुष्परिणाम प्रत्येकाने समजून घ्यावेत. कोणतेही तंत्रज्ञान चांगल्या लोकांच्या हाती लागले तर त्याचा वापर चांगल्यासाठीच होतो. परंतु ते चुकीच्या लोकांच्या हातात पडले तर विघातक कामासाठी त्याचा वापर केला जातो. ते म्हणाले की, समाजातील नाराज लोक सायबर क्राईमकडे वळतात. त्यातही १४ ते ३0 वयोगटाचा समावेश अधिक आहे; परंतु कायद्यात कोणालाही माफी नाही. याचे भान ठेवले पाहिजे. त्यामुळे इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. कोणाचाही डेटा मिळवून तपासण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींची संगत करुन आयुष्य उद्ध्वस्त करुन घेऊ नका. विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ असले पाहिजेत. ‘धूम’ स्टाईलने गाडी चालवून क्षणिक आनंद मिळविण्यापेक्षा चांगल्या मार्गाने नाव कमवा. समाजाला आदर्श तरुणांची गरज आहे. (प्रतिनिधी) वेळच आयुष्य पालटते! हेमंतकुमार शहा यांनी वेळेला किती किंमत आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून देताना आपल्याच आयुष्यातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, विश्वास नांगरे-पाटील आणि मी एकाच ठिकाणी शिकत होतो. ते एकेका मिनिटाचा पुरेपूर सदुपयोग करीत असत. मी व काही मित्र थोडाफार ‘टाईमपास’ करून अभ्यास करत होतो. प्रत्येक मिनिटाला महत्त्व देणारे नांगरे-पाटील आयपीएस बनले. मी अजून पोलीस निरीक्षकच आहे. यावरून वेळच आयुष्य पालटते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वेळेची किंमत ओळखायला शिका, असे त्यांनी सांगितले.