शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

बंदर विकासाच्या मागणीचा आग्रह

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

प्रश्न कधी सुटणार : जलपर्यटनाला अधिक संधी देण्याची मागणी

रत्नागिरी : राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कोकणातील बंदरे गाळात रुतली आहेत. दाभोळ, गोवळकोट, दापोली येथील कोंडजाई, मंडणगड-महाडमधील सावित्री व चिपळूण येथील वाशिष्ठीमधील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच पडून राहिला आहे.कोकणातील या नदीपात्रांतील गाळ उपसण्याची मागणी त्या त्या पालिकांनी प्रशासनाकडे केली होती. राज्य शासनाच्या कडा विभागातर्फे पूर्वी हा गाळ काढला जायचा. मात्र, कालांतराने हा विभाग बंद केल्यानंतर गाळ उपसण्यासाठी येणाऱ्या खर्चावरुन पालिका व पाटबंधारे विभाग यांच्यात चुरस निर्माण झाली. त्यातून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जलवाहतूक तर सोडाच मात्र या नदीपात्रांना विस्तीर्ण स्वरुप केव्हा प्राप्त होणार, असा सवाल विचारला जात आहे.जिल्ह्यात दाभोळ, हर्णै, पूर्वीचे मुसाकाझी ही बंदरे प्रसिद्ध होती. आज या बंदरातून बोटी दुरापास्त झाल्या आहेत. राज्यकर्त्यांनी कोकणात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा यापूर्वी केल्या. त्यादृष्टीने युरोप वारीही करण्यात आली होती. मात्र, बंदरांचा विकास तसाच अडकून राहिला. मध्यंतरीच्या काळात राज्यकर्त्यांमधील श्रेयवादात हा प्रश्न अडकला होता. यावरुन मंत्र्यांची जुंपली होती. मात्र, गाळ काढण्याचे उत्तरदायित्व कोणी स्वीकारायचे, या मुद्द्यावर काही ठिकाणी प्रश्न तसाच पडून राहिला. चिपळूण येथील शिव, वाशिष्टीमधील गाळ काढण्यासंदर्भात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रयत्न केले जात होते. मात्र, गाळ काढला तरी काही ठिकाणी पुराचा प्रश्न निर्माण झाला होता. गाळ काढण्याचे कायमस्वरुपी काम करावे, अशी मागणी करत पालिकेने हा विषय पाटबंधारे खात्याकडे सोपवला होता. त्यानंतर स्वच्छता व गाळ काढणे या विषयासाठी चिपळूण पालिकेची पूर्वी बैठकही झाली होती. प्रशासन, राज्य सरकार व लोकप्रतिनिधी या तिन्ही बाजूंनी प्रयत्न झाल्यास या नदीपात्रांतील गाळ पूर्णपणे काढला जाईल. गोवळकोट, कालुस्ते, करंबवणे या परिसरात जलपर्यटनालाही वाव मिळणार आहे. मात्र, त्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)