शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

बंदर विकासाच्या मागणीचा आग्रह

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

प्रश्न कधी सुटणार : जलपर्यटनाला अधिक संधी देण्याची मागणी

रत्नागिरी : राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कोकणातील बंदरे गाळात रुतली आहेत. दाभोळ, गोवळकोट, दापोली येथील कोंडजाई, मंडणगड-महाडमधील सावित्री व चिपळूण येथील वाशिष्ठीमधील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच पडून राहिला आहे.कोकणातील या नदीपात्रांतील गाळ उपसण्याची मागणी त्या त्या पालिकांनी प्रशासनाकडे केली होती. राज्य शासनाच्या कडा विभागातर्फे पूर्वी हा गाळ काढला जायचा. मात्र, कालांतराने हा विभाग बंद केल्यानंतर गाळ उपसण्यासाठी येणाऱ्या खर्चावरुन पालिका व पाटबंधारे विभाग यांच्यात चुरस निर्माण झाली. त्यातून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जलवाहतूक तर सोडाच मात्र या नदीपात्रांना विस्तीर्ण स्वरुप केव्हा प्राप्त होणार, असा सवाल विचारला जात आहे.जिल्ह्यात दाभोळ, हर्णै, पूर्वीचे मुसाकाझी ही बंदरे प्रसिद्ध होती. आज या बंदरातून बोटी दुरापास्त झाल्या आहेत. राज्यकर्त्यांनी कोकणात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा यापूर्वी केल्या. त्यादृष्टीने युरोप वारीही करण्यात आली होती. मात्र, बंदरांचा विकास तसाच अडकून राहिला. मध्यंतरीच्या काळात राज्यकर्त्यांमधील श्रेयवादात हा प्रश्न अडकला होता. यावरुन मंत्र्यांची जुंपली होती. मात्र, गाळ काढण्याचे उत्तरदायित्व कोणी स्वीकारायचे, या मुद्द्यावर काही ठिकाणी प्रश्न तसाच पडून राहिला. चिपळूण येथील शिव, वाशिष्टीमधील गाळ काढण्यासंदर्भात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रयत्न केले जात होते. मात्र, गाळ काढला तरी काही ठिकाणी पुराचा प्रश्न निर्माण झाला होता. गाळ काढण्याचे कायमस्वरुपी काम करावे, अशी मागणी करत पालिकेने हा विषय पाटबंधारे खात्याकडे सोपवला होता. त्यानंतर स्वच्छता व गाळ काढणे या विषयासाठी चिपळूण पालिकेची पूर्वी बैठकही झाली होती. प्रशासन, राज्य सरकार व लोकप्रतिनिधी या तिन्ही बाजूंनी प्रयत्न झाल्यास या नदीपात्रांतील गाळ पूर्णपणे काढला जाईल. गोवळकोट, कालुस्ते, करंबवणे या परिसरात जलपर्यटनालाही वाव मिळणार आहे. मात्र, त्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)