शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बंदर विकासाच्या मागणीचा आग्रह

By admin | Updated: February 2, 2015 23:51 IST

प्रश्न कधी सुटणार : जलपर्यटनाला अधिक संधी देण्याची मागणी

रत्नागिरी : राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कोकणातील बंदरे गाळात रुतली आहेत. दाभोळ, गोवळकोट, दापोली येथील कोंडजाई, मंडणगड-महाडमधील सावित्री व चिपळूण येथील वाशिष्ठीमधील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच पडून राहिला आहे.कोकणातील या नदीपात्रांतील गाळ उपसण्याची मागणी त्या त्या पालिकांनी प्रशासनाकडे केली होती. राज्य शासनाच्या कडा विभागातर्फे पूर्वी हा गाळ काढला जायचा. मात्र, कालांतराने हा विभाग बंद केल्यानंतर गाळ उपसण्यासाठी येणाऱ्या खर्चावरुन पालिका व पाटबंधारे विभाग यांच्यात चुरस निर्माण झाली. त्यातून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जलवाहतूक तर सोडाच मात्र या नदीपात्रांना विस्तीर्ण स्वरुप केव्हा प्राप्त होणार, असा सवाल विचारला जात आहे.जिल्ह्यात दाभोळ, हर्णै, पूर्वीचे मुसाकाझी ही बंदरे प्रसिद्ध होती. आज या बंदरातून बोटी दुरापास्त झाल्या आहेत. राज्यकर्त्यांनी कोकणात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा यापूर्वी केल्या. त्यादृष्टीने युरोप वारीही करण्यात आली होती. मात्र, बंदरांचा विकास तसाच अडकून राहिला. मध्यंतरीच्या काळात राज्यकर्त्यांमधील श्रेयवादात हा प्रश्न अडकला होता. यावरुन मंत्र्यांची जुंपली होती. मात्र, गाळ काढण्याचे उत्तरदायित्व कोणी स्वीकारायचे, या मुद्द्यावर काही ठिकाणी प्रश्न तसाच पडून राहिला. चिपळूण येथील शिव, वाशिष्टीमधील गाळ काढण्यासंदर्भात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रयत्न केले जात होते. मात्र, गाळ काढला तरी काही ठिकाणी पुराचा प्रश्न निर्माण झाला होता. गाळ काढण्याचे कायमस्वरुपी काम करावे, अशी मागणी करत पालिकेने हा विषय पाटबंधारे खात्याकडे सोपवला होता. त्यानंतर स्वच्छता व गाळ काढणे या विषयासाठी चिपळूण पालिकेची पूर्वी बैठकही झाली होती. प्रशासन, राज्य सरकार व लोकप्रतिनिधी या तिन्ही बाजूंनी प्रयत्न झाल्यास या नदीपात्रांतील गाळ पूर्णपणे काढला जाईल. गोवळकोट, कालुस्ते, करंबवणे या परिसरात जलपर्यटनालाही वाव मिळणार आहे. मात्र, त्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)