शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

चिपळूण तालुका : ४० लाख रूपये खर्च करून राबविलेली योजना निकृष्ट

अडरे : चिपळूण तालुक्यातील तळसर, अनारी, कुडप व डेरवण येथील धनगरवाड्यांकरिता भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याने या योजनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश राजेशिर्के, उपसरपंच दत्ताराम राजेशिर्के, सखाराम ढेबे, बाबू बोडेकर, भाऊ हिरवे, धोंडू खरात, रामचंद्र बावदाने, यशवंत वरक, संतोष बावदाने, चंद्रकांत कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपाणी योजना राबवूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत चार गावातील धनगरवाड्यांसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच ही योजना अयशस्वी ठरली असून, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. ही नळपाणी योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत संयुक्त कमिटीने तळसर, अनारी, कुडप, डेरवण राजवाडी धरणातून पाणी उचलून राबविण्यात आली. १६ एप्रिल २००९ला कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१० पर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, ३ वर्ष हे काम उशिरा करण्यात आले. या योजनेबाबत १ जूनला ग्रामस्थांनी उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र, पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाचे जंगम यांच्याबरोबर ग्रामस्थ व ठेकेदार यांची चर्चा करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन खोदकामासाठी २ लाख १७ हजारचे बिल अदा केले आहे. २ हजार ४०० मीटर लांबी, २ बाय २ ची खोदाई केली आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासकीयस्तरावर सखोल चौकशी करण्यासाठी त्रीस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रूपये खर्च करून नळपाणी योजना गावात राबवल्या जातात. मात्र, योजनेचे काम करताना ते सुयोग्य पध्दतीने केले नाही तर अशा योजनांचा बोजवारा उडतो हे अशा प्रकारातून सिध्द होते आहे. संबंधित योजनेतील संबंधितांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)तळसर, अनारी, कुडप व डेरवण नळपाणी योजनेची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी.अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याचा तळसर भागातील ग्रामस्थांचा आरोप. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यास कोण जबाबदार.