शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

चिपळूण तालुका : ४० लाख रूपये खर्च करून राबविलेली योजना निकृष्ट

अडरे : चिपळूण तालुक्यातील तळसर, अनारी, कुडप व डेरवण येथील धनगरवाड्यांकरिता भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याने या योजनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश राजेशिर्के, उपसरपंच दत्ताराम राजेशिर्के, सखाराम ढेबे, बाबू बोडेकर, भाऊ हिरवे, धोंडू खरात, रामचंद्र बावदाने, यशवंत वरक, संतोष बावदाने, चंद्रकांत कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपाणी योजना राबवूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत चार गावातील धनगरवाड्यांसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच ही योजना अयशस्वी ठरली असून, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. ही नळपाणी योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत संयुक्त कमिटीने तळसर, अनारी, कुडप, डेरवण राजवाडी धरणातून पाणी उचलून राबविण्यात आली. १६ एप्रिल २००९ला कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१० पर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, ३ वर्ष हे काम उशिरा करण्यात आले. या योजनेबाबत १ जूनला ग्रामस्थांनी उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र, पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाचे जंगम यांच्याबरोबर ग्रामस्थ व ठेकेदार यांची चर्चा करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन खोदकामासाठी २ लाख १७ हजारचे बिल अदा केले आहे. २ हजार ४०० मीटर लांबी, २ बाय २ ची खोदाई केली आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासकीयस्तरावर सखोल चौकशी करण्यासाठी त्रीस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रूपये खर्च करून नळपाणी योजना गावात राबवल्या जातात. मात्र, योजनेचे काम करताना ते सुयोग्य पध्दतीने केले नाही तर अशा योजनांचा बोजवारा उडतो हे अशा प्रकारातून सिध्द होते आहे. संबंधित योजनेतील संबंधितांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)तळसर, अनारी, कुडप व डेरवण नळपाणी योजनेची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी.अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याचा तळसर भागातील ग्रामस्थांचा आरोप. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यास कोण जबाबदार.