शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

धनगरवाड्यांसाठी पाण्याची गैरसोयच..

By admin | Updated: June 9, 2015 00:10 IST

चिपळूण तालुका : ४० लाख रूपये खर्च करून राबविलेली योजना निकृष्ट

अडरे : चिपळूण तालुक्यातील तळसर, अनारी, कुडप व डेरवण येथील धनगरवाड्यांकरिता भारत निर्माण योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याने या योजनेची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अन्यथा ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश राजेशिर्के, उपसरपंच दत्ताराम राजेशिर्के, सखाराम ढेबे, बाबू बोडेकर, भाऊ हिरवे, धोंडू खरात, रामचंद्र बावदाने, यशवंत वरक, संतोष बावदाने, चंद्रकांत कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळपाणी योजना राबवूनही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत चार गावातील धनगरवाड्यांसाठी नळपाणी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच ही योजना अयशस्वी ठरली असून, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. ही नळपाणी योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत संयुक्त कमिटीने तळसर, अनारी, कुडप, डेरवण राजवाडी धरणातून पाणी उचलून राबविण्यात आली. १६ एप्रिल २००९ला कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. आॅगस्ट २०१० पर्यंत हे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, ३ वर्ष हे काम उशिरा करण्यात आले. या योजनेबाबत १ जूनला ग्रामस्थांनी उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र, पंचायत समिती ग्रामीण पुरवठा विभागाचे जंगम यांच्याबरोबर ग्रामस्थ व ठेकेदार यांची चर्चा करण्यात आली. या नळपाणी योजनेसाठी पाईपलाईन खोदकामासाठी २ लाख १७ हजारचे बिल अदा केले आहे. २ हजार ४०० मीटर लांबी, २ बाय २ ची खोदाई केली आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत शासकीयस्तरावर सखोल चौकशी करण्यासाठी त्रीस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रूपये खर्च करून नळपाणी योजना गावात राबवल्या जातात. मात्र, योजनेचे काम करताना ते सुयोग्य पध्दतीने केले नाही तर अशा योजनांचा बोजवारा उडतो हे अशा प्रकारातून सिध्द होते आहे. संबंधित योजनेतील संबंधितांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)तळसर, अनारी, कुडप व डेरवण नळपाणी योजनेची शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी.अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्याचा तळसर भागातील ग्रामस्थांचा आरोप. चिपळूण तालुक्यातील चार धनगरवाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यास कोण जबाबदार.