शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

आकेशियाची बेसुमार तोड

By admin | Updated: August 19, 2015 23:36 IST

मंडणगड तालुका : वन विभागाच्या आशीर्वादाने बेमालूम कत्तल

मंडणगड : वन विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील काही लाकूडमाफियांनी बांधकाम विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन रस्त्यांशेजारील आकेशिया झाडांची खुलेआम कत्तल सुरू ठेवली आहे. त्यामुळे दोन्ही विभागातील वरिष्ठांनी वृक्षतोडीचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या सर्वच आकेशियाच्या वृक्षतोडीचे सत्र गेल्या आठवड्यात सुरु झाले असून, यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही प्रमुख रस्त्यांशेजारची वृक्षतोड अद्याप थांबलेली नाही.सावरी घोसाळे पट्ट्यातील गावांमधून आकेशियाची तोड करुन गाड्या भरुन जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागाने वृक्ष तोडण्यासाठी कुठलाही अधिकृत लिलाव केलेला नाही. मात्र, वाहतुकीस अडचण ठरणारी, वाकलेली झाडे तोडण्याची सूचना येथील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात दिल्याची माहिती मिळाली आहे.कायदा व प्रक्रियेला फाटा देऊन बांधकाम विभागाने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असली तरी वृक्षतोड करताना बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थितच न राहिल्याने वाहतुकीस अडथळा असलेली झाडे वगळता इतर सर्व झाडे तोडून साफ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वृक्षतोडीसाठी पुढे असलेल्या लाकूडमाफियांना येथील वन खात्याच्या प्रमुखांचा पाठिंबा असल्याचेही त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. बांधकाम विभागाकडे अपुरे मनष्यबळ असल्याने असे प्रकार घडत असल्याचे येथील अभियंत्याचे मत आहे. दुसरीकडे कोणत्याही प्रक्रियेविना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडतोडीचे आदेश निर्गमित केलेच कसे? हासुध्दा मुख्य प्रश्न यानिमित्ताने पुढे येतो.लाकूडमाफिया, बांधकाम व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे त्रिकूट जमण्यामागे अर्थकारणाचे झाले असल्याची चर्चाही सुरु आहे. वृक्षतोडीमुळे शासनाचा महसूल बुडत आहेच, मात्र, कारवाई होत नसल्याने लाकूडमाफियांचे धारिष्ठ्य वाढले आहे. मंडणगडमध्ये सुरु असलेली झाडांची बेकायदा कत्तल थांबवण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1गाड्या भरून वाहतूकमंडणगडात आकेशियाची वृक्षतोड होत असून, त्याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहे.2बांधकाम विभागाच्या ताब्यात हा परिसर आहे. मात्र, बांधकाम खात्यानेही दुर्लक्ष केले आहे.3रस्त्याशेजारी वृक्षतोड होत आहे आणि कोणत्याही शासकीय यंत्रणेला त्याचा पत्ताच नाही.