शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

तिच्यासाठी दोन भाऊच झालेत हात

By admin | Updated: August 28, 2015 23:49 IST

शंभर टक्के अपंग बहीण स्वत:हून काहीच करून शकत नसल्यामुळे तिला दुसऱ्यावरच निर्भर रहावे लागत आहे. त्यामुळे तिच्यासाठीही रक्षाबंधन सणाचे महत्व मोठे आहे.

रत्नागिरी : जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर पोलिओने दोन्ही पाय व डावा हात गमावला. केवळ एकच हात बरा आहे. परंतु, पुर्णत: आईवडील व भावंडावर अवलंबून असलेली बहीण रक्षाबंधनादिवशी आपल्या भावाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करते. कारण शंभर टक्के अपंग बहीण स्वत:हून काहीच करून शकत नसल्यामुळे तिला दुसऱ्यावरच निर्भर रहावे लागत आहे. त्यामुळे तिच्यासाठीही रक्षाबंधन सणाचे महत्व मोठे आहे.मूळत: बिजापूर येथील कमाल गवंडी यांचे कुटूंब गेली ४० ते ५० वर्षे संगमेश्वर येथे स्थायिक आहे. १९८३ च्या पुरातील नुकसानग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन नगर येथे पुनर्वसन करण्यात आले. गवंडी देखील तेव्हापासून पुनर्वसन नगरात स्थायिक आहेत. कमाल यांना तीन अपत्ये दोन मुलगे व एक मुलगी. दोन्ही मुलगे अल्पशिक्षित असून, गवंडी काम करतात. परंतु, मुलगी रेश्मा दोन्ही पाय व एका हाताने अपंग आहे. त्यामुळे ती पूर्णत: आईवर अवलंबून आहे. स्वत:हून ती काहीच करू शकत नाही. कमाल यांची घरची स्थिती बेताची आहे. दोन्ही भावांच्या मजुरीवर घर चालत आहे. रेश्मा यांनी अपंग असून, सातवीपर्यत शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणाची आवड इच्छा असतानासु्ध्दा अपंगत्वामुळे ती पूर्ण करू शकलेल्या नाहीत. शिवणकाम शिकून उदरनिर्वाह करावा तर उजव्या हातातही फारशी ताकद नसल्यामुळे तेही करू न शकत नसल्याची खंत रेश्मा यांना वाटते. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यामुळे रेश्मा यांना ‘रक्षाबंधन’ सणाचे फार महत्व वाटते. बहीण-भावांचे नाते राखीच्या धाग्यामुळे घट्ट बांधून राहते. परंतु, रेश्मा म्हणतात की, मी पूर्णत: परावलंबी आहे. आई माझे सर्व काही करित असली तरी भावंडांमुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज माझ्यासाठी माझे भाऊ सर्वकाही आहेत. मी पूर्ण अपंग असले तरी माझे दोन्ही भाऊ माझे दोन हात आहेत. त्यांच्या बळामुळेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण होतो.शासनाकडून रेश्मा हिला काही महिन्यांपूर्वीच ६०० रूपयांची पेन्शन दरमहा सुरू झाली आहे. शासनातर्फे अपंगासाठी मेळावे आयोजित करून त्यांच्या स्वालंबनासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जावीत. अपंगानुरूप एखाद्या कामाचे प्रशिक्षण द्यावे, शिवाय वैद्यकीय उपचार केले जावेत, जेणेकरून स्वावलंबी होण्यासाठी काही अंशी का होईना मदत मिळेल अशी आशा रेश्मा हिने व्यक्त केली. आईवडील, भाऊ यांचा मला आधार आहे. माझ्यासारख्या अपंग मंडळींनाही आधार मिळावा, रक्षाबंधन सण हा विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही. प्रत्येक बहीणभावंडाचा आहे. माझ्यासाठी माझ्या भावंडांचे योगदान मोठे आहे, त्यामुळे माझ्यासाठी रक्षाबंधनाचा सण अनमोल आहे, अशी प्रतिक्रिया रेश्मा हिने व्यक्त केली.