शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चुका टाळण्याचा प्रयत्न करा

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

शोयराज जीवन वाल्मिकी : कणकवली येथील जिल्हा काँग्रेस बैठकीत मार्गदर्शन

कणकवली : काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षात सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जातो. यापुढेही तो दिला जाईल. मागील काळात घडलेल्या चुका भविष्यात पुन्हा घडणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोयराज जीवन वाल्मिकी यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी जानवली येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, प्रांतिक सदस्य विकास सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष डी. बी. वारंग, डॉ. यावरअली शेख, डॉ. जयेंद्र परुळेकर, अशोक सावंत, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा परब आदी उपस्थित होते. यावेळी वाल्मिकी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो देशभक्तांनी अंगावर गोळ्या झेलल्या. कित्येक तरुण फासावर गेले आहेत. हे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. प्रत्येक पदाधिकाऱ्याने ग्रामीण भागातील जनतेला रस्ते, पाणी, आरोग्य यासह इतर सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांचे नेतृत्व मानत आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी या नेतृत्वाचे हात बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा तसेच कार्यकर्त्यांमधील क्षमता सिद्ध करा. काँग्रेस पक्षात राहून राजकीय कुरघोड्या करणाऱ्या व पक्षविरोधी काम करणाऱ्यांची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पुराव्यासहीत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश सावंत, विकास सावंत, एम. के. गावडे, अस्मिता बांदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी येथील सुरेश परब यांची जिल्हा चिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल वाल्मिकी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)कार्यकर्त्यांचा सन्मानकाँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी कार्यरत असतो. विविध उपक्रम पक्षाच्या माध्यमातून तो राबवित असतो. अशा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे असेही शोयराज जीवन वाल्मिकी यांनी बैठकीत सांगितले.