शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

चुका टाळण्याचा प्रयत्न करा

By admin | Updated: February 13, 2015 22:56 IST

शोयराज जीवन वाल्मिकी : कणकवली येथील जिल्हा काँग्रेस बैठकीत मार्गदर्शन

कणकवली : काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षात सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जातो. यापुढेही तो दिला जाईल. मागील काळात घडलेल्या चुका भविष्यात पुन्हा घडणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोयराज जीवन वाल्मिकी यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी जानवली येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, प्रांतिक सदस्य विकास सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष डी. बी. वारंग, डॉ. यावरअली शेख, डॉ. जयेंद्र परुळेकर, अशोक सावंत, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा परब आदी उपस्थित होते. यावेळी वाल्मिकी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो देशभक्तांनी अंगावर गोळ्या झेलल्या. कित्येक तरुण फासावर गेले आहेत. हे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. प्रत्येक पदाधिकाऱ्याने ग्रामीण भागातील जनतेला रस्ते, पाणी, आरोग्य यासह इतर सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांचे नेतृत्व मानत आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी या नेतृत्वाचे हात बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा तसेच कार्यकर्त्यांमधील क्षमता सिद्ध करा. काँग्रेस पक्षात राहून राजकीय कुरघोड्या करणाऱ्या व पक्षविरोधी काम करणाऱ्यांची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पुराव्यासहीत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सतीश सावंत, विकास सावंत, एम. के. गावडे, अस्मिता बांदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी येथील सुरेश परब यांची जिल्हा चिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल वाल्मिकी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)कार्यकर्त्यांचा सन्मानकाँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी कार्यरत असतो. विविध उपक्रम पक्षाच्या माध्यमातून तो राबवित असतो. अशा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे असेही शोयराज जीवन वाल्मिकी यांनी बैठकीत सांगितले.