शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

जिल्हा तंबाखू, कॅन्सरमुक्तीसाठी ‘वसुंधरा’चे विशेष अभियान--जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष

रजनीकांत कदम -- कुडाळ--संपूर्ण जगात तंबाखूने थैमान घातले असतानाच सिंधुदुर्गातही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून जास्तीत जास्त जनता ही तंबाखूच्या व्यसनाधीन असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी अमेरिका येथील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ व जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. अनिल नेरुरकर हे नि:स्वार्थीपणे केवळ सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू व कॅन्सरमुक्त व्हावा या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ‘तंबाखू व्यसन मुक्ती जाणीव व जागृती अभियान’ वसुधंरा विज्ञान केंद्रामार्फत राबवीत असून हेच अभियान महाराष्ट्रभर राबविण्याचाही त्यांचा मानस आहे. ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून डॉ. नेरुरकर हे सन २०११ पासून दरवर्षी जिल्ह्यात येऊन तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात मोफतपणे राबवितात.जिल्हा तंबाखू मुक्त व कॅन्सर मुक्त व्हावा याकरिता डॉ. नेरुरकर यांच्यावतीने वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यात तंबाखू व्यसनमुक्ती जाणीव व जागृती अभियान सन २०११ पासून आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे. या सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाविषयी माहिती- सन २०११-१६ पर्यंत घेण्यात आलेल्या २० (तोंड तपासणी) प्राथमिक कर्करोग मोफत तपासणी शिबिरात आतापर्यंत १ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ८३ लोक कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असल्याचे आढळले. या उपक्रमांतर्गत वसुंधरा टाटा आॅन बाईकची सुरुवात ३० सप्टेंबर २०१४ रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज कॉलेजमधून करण्यात आली. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५ गावांमध्ये तोंडाची तपासणी शिबिरात ५९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली तसेच जन^-जागृती करिता ३००० पेक्षा अधिक लोकांना माहिती देण्यात आली. व कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येते. वसुंधरा विज्ञान केंद्र व मुंबई टाटा हॉस्पिटल च्यावतीने २००१ ते २०१६ पर्यंत साधारणपणे ५५० शाळा व कॉलेजमधील साधारणपणे १ लाख २५ हजार मुलांना तंबाखू व्यसनमुक्ती व कॅन्सरमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. नेरूरकरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अभियानात डॉ. वैशाली पडते, सतीश मदभावे, भरत पालव, नारायण धावडे, महेंद्र दुरेकर, उत्तम कदम, श्रावणी मदभावे, राशी वेंगुर्लेकर, आशा स्वयंसेविका तसेच वसुधंरा विज्ञान केंद्राचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी हे ही सहभागी होऊन कार्यरत असतात. कायदा काय सांगतो १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील व्यक्तीस विक्री करणे दंडनीय आहे, बंदिस्त सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणेस मनाई, शैक्षणिक संस्थांच्या (शाळा, महाविद्यालय आदीच्या) १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवनास मनाई, तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर सूचना असणे गरजेचे (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/ नंतर ५ वर्षांनंतर कारावास व ५ हजारपर्यंत दंड), तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी. (पहिल्यांदा २ वर्षांपर्यंत कारावास किंवा १ हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. दुसऱ्यांदा/नंतर ५ वर्षांनंतर कारावास आणि ५ हजारपर्यंत दंड. तंबाखू सेवनाचे दुष्परिणामतोंडाचा कॅन्सर, मोतीबिंदू, घशाचा कॅन्सर, निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य मंदावते, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुस कॅन्सर, श्वासाचा त्रास, यकृताचा कॅन्सर, हृदयविकार, पोटाचा अल्सर, पोटाचा कॅन्सर, नपुंसकत्व, रक्त न पोहोचल्याने हाताची बोटे गळून पडणे, रक्तवाहिन्या संकुलित पावणे, वाढती पाय दुखणी, कार्यक्षमता मंदावणे. तसेच तोंडाला दुर्गंधी, दातांच्या समस्या, दात सडणे, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय आदी सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतो.