शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

रेल्वेस्थानकावर तिकीटांचा काळाबाजार कुडाळमधील घटना

By admin | Updated: May 25, 2014 01:12 IST

प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना धरले धारेवर

कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकावर तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे प्रवाशांच्या नजरेस आल्यावर प्रवाशांनी याबाबत तेथील रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. प्रवाशांबरोबर झालेल्या वादानंतर रेल्वे पोलिसाने यापुढे योग्य काळजी घेण्याचे मान्य केल्यावर संतप्त प्रवासी शांत झाले. सध्या जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. मोठ्या प्रमाणात चाकरमानी रेल्वेने परत जात आहेत. आपला प्रवास गर्दीशिवाय व सुखरूप व्हावा, याकरिता रेल्वेची तत्काळ तिकीट काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. याचप्रकारे कुडाळ रेल्वेस्थानकावरदेखील तत्काळ तिकिटांमधून आपल्याला आरक्षण मिळावे, म्हणून हे चाकरमानी पहाटेच दाखल होतात. परंतु पहाटे आलेल्या चाकरमान्यांचाही हिरमोड होतो. कारण कुडाळच्या ह्या तिकिट घरामध्ये अगोदरच कुणीतरी तिकिटांसाठी रात्रीपासूनच रांगा लावलेल्या असतात. याबाबत अज्ञाताने अर्ज करून स्थानकावर तिकिटांचा काळा बाजार होत असल्याची तक्र ार केली होती. त्यामुळे कणकवली येथून शनिवारी सकाळी एक रेल्वे पोलीस कुडाळ रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आला होता. प्रवाशांच्या तक्रारी याठिकाणी काहीजण स्वत:साठी नाहीत, तर जादा पैसे घेऊन दुसर्‍यांची तिकिटे काढून देतात. रात्री एक आणि सकाळी दुसरा माणूस या ठिकाणी रांगेत उभा असतो परंतु ती व्यक्ती रेल्वे प्रवास करणारी नसते. कणकवलीहून आलेल्या रेल्वे पोलिसाने संबंधित सर्वांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेतील काहीजणांनी आमची ओळखपत्रे तुम्ही तपासू शकत नाही, असे सांगितले. तर काहींनी सर्वांची ओळखपत्रे तपासा व ज्यांचा प्रवाशांशी काहीही संबंध नाही, अशांना बाहेर काढा, असे सांगितले. त्यामुळे काहीवेळ बाचाबाची झाली होती. यावेळी वातावरण तंग बनल्याने एकटा रेल्वे पोलीस पुरता हैराण झाला होता. त्याला तिकीट काढण्यासाठी आलेल्या काही प्रवाशांनी धारेवर धरले. कुडाळात रेल्वे पोलीस नाही काही लोकांनी आणखी पोलीस नाहीत का, अशी विचारणा केली असता त्या पोलिसाने, कुडाळात पोलीस नाहीत. मला कणकवलीहून पाठविले आहे, असे सांगितले. त्यामुळे कुडाळसारख्या मध्यवर्ती ठिकाणच्या गजबजलेल्या रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी रेल्वे पोलीस नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही उद्यापासून या ठिकाणी योग्य ती काळजी घेऊ. तसेच दररोज तिकिटे काढण्यासाठी आलेल्यांना योग्यप्रकारे शहानिशा करून मगच तिकिटे काढण्यासाठी देऊ, असे सांगितले. एकंदरीत पाहता, रेल्वेस्थानकावर दलालांच्या तत्काळ तिकिटांच्या काळाबाजार करण्याच्या उद्योग जोरदार सुरू झाला असून यावर मात्र प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येते. नियमात तिकिटे काढणार्‍यांना मात्र याचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)