शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

By admin | Updated: May 21, 2015 00:05 IST

अनेक वर्षांची परंपरा : अख्खा गाव अन् भक्त रात्रभर जागतो...

चिपळूण : उदो गं... अंबाबाई उदो गं... अंबाबाई... अंबाबाईच्या नावाने उदो... उदो... अशी आर्त हाक गोंधळी मनापासून घालतो आणि अंबेला विनवणी करतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोंधळास सुरुवात होते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा आणि परंपरा मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे. ग्रामीण भागात लग्नानंतर किंवा पांजीचा म्हणून गोंधळ घालण्याची परंपरा आजही जोपासली जाते. गोंधळ घातला नाही तर जीवनाचा गोंधळ होतो, असा एक समज असल्याने गोंधळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गावोगावी गोंधळ्यांना मोठी मागणी असते. परंतु, काही गोंधळ्यांची ठराविक गावांशी बांधिलकी असते. त्यामुळे त्याच गोंधळ्याला सन्मानाने आणले जाते. त्याला काही अडचण असेल तर त्याच्या परवानगी किंवा त्याने दिलेला दुसरा सहकारी स्वीकारला जातो. देवाच्या नावाने हा गोंधळ सुरु करण्यापूर्वी गावात जोगवा मागितला जातो. त्यानंतर कवड्याची माळ गळ्यात घालून विधिवत मांड भरला जातो. सायंकाळच्या वेळी यजमान दिवटी पाजळतो. यावेळी अंबाबाईच्या नावाचा उदो उदो केला जातो. गोंधळी पहाडी आवाजात पंचक्रोशीतील ग्रामदेवतांना व देवदेवतांना गोंधळासाठी आवाहन करतो. प्रथेनुसार यजमान व त्याचे सहकारी या गोंधळात सहभागी होतात. त्यानुसार त्याची बिदागी ठरलेली असते. ठराविक कुटुंबापेक्षा जास्त दिवट्या पेटल्या, तर त्यासाठी वेगळे मानधन आकारले जाते.एकूणच गोंधळ्यांसाठी हा काळ पर्वणीचा असतो. नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असणारे गोंधळी या काळात रजा काढून आपल्या गावात येतात. त्यामुळे त्यांना डबल उत्पन्न मिळते. बदलत्या चंगळवादाचा फायदा आता याही व्यवसायाला मिळू लागला आहे. खेळीमेळीच्या वातावरणात रात्री कथेचा कार्यक्रम होतो आणि हास्याचे फवारे उडतात.एखादी पौराणिक किंवा काल्पनिक कथा रात्रभर नागरिकांना खिळवून ठेवते. हा कार्यक्रम पहाटे ४ पर्यंत चालतो. अखंड रात्र यासाठी जागवली जाते. गोंधळाची ही अनोखी ही प्रथा आणि परंपरा आजही जुन्या परंपरेनुसार टिकून राहिली आहे. गोंधळासाठी खास करुन बोकडाचा बळी दिला जातो आणि हे मांसाहारी जेवण संपूर्ण गावाला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोंधळ म्हटले की, एक अनोखी पर्वणीच असते. याहीवर्षी हा उत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)अंबाबाईचा गोंधळ घालण्याची प्रथा ही कित्येक वर्षांपूर्वीची जुनी आहे. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली ही प्रथा आजही गावागावांमध्ये जपली जात आहे. गोंधळाच्या कार्यक्रमाला गावाबाहेर असलेले ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात आणि देवीचा गोंधळ मांडतात.