शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

By admin | Updated: May 21, 2015 00:05 IST

अनेक वर्षांची परंपरा : अख्खा गाव अन् भक्त रात्रभर जागतो...

चिपळूण : उदो गं... अंबाबाई उदो गं... अंबाबाई... अंबाबाईच्या नावाने उदो... उदो... अशी आर्त हाक गोंधळी मनापासून घालतो आणि अंबेला विनवणी करतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोंधळास सुरुवात होते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा आणि परंपरा मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे. ग्रामीण भागात लग्नानंतर किंवा पांजीचा म्हणून गोंधळ घालण्याची परंपरा आजही जोपासली जाते. गोंधळ घातला नाही तर जीवनाचा गोंधळ होतो, असा एक समज असल्याने गोंधळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गावोगावी गोंधळ्यांना मोठी मागणी असते. परंतु, काही गोंधळ्यांची ठराविक गावांशी बांधिलकी असते. त्यामुळे त्याच गोंधळ्याला सन्मानाने आणले जाते. त्याला काही अडचण असेल तर त्याच्या परवानगी किंवा त्याने दिलेला दुसरा सहकारी स्वीकारला जातो. देवाच्या नावाने हा गोंधळ सुरु करण्यापूर्वी गावात जोगवा मागितला जातो. त्यानंतर कवड्याची माळ गळ्यात घालून विधिवत मांड भरला जातो. सायंकाळच्या वेळी यजमान दिवटी पाजळतो. यावेळी अंबाबाईच्या नावाचा उदो उदो केला जातो. गोंधळी पहाडी आवाजात पंचक्रोशीतील ग्रामदेवतांना व देवदेवतांना गोंधळासाठी आवाहन करतो. प्रथेनुसार यजमान व त्याचे सहकारी या गोंधळात सहभागी होतात. त्यानुसार त्याची बिदागी ठरलेली असते. ठराविक कुटुंबापेक्षा जास्त दिवट्या पेटल्या, तर त्यासाठी वेगळे मानधन आकारले जाते.एकूणच गोंधळ्यांसाठी हा काळ पर्वणीचा असतो. नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असणारे गोंधळी या काळात रजा काढून आपल्या गावात येतात. त्यामुळे त्यांना डबल उत्पन्न मिळते. बदलत्या चंगळवादाचा फायदा आता याही व्यवसायाला मिळू लागला आहे. खेळीमेळीच्या वातावरणात रात्री कथेचा कार्यक्रम होतो आणि हास्याचे फवारे उडतात.एखादी पौराणिक किंवा काल्पनिक कथा रात्रभर नागरिकांना खिळवून ठेवते. हा कार्यक्रम पहाटे ४ पर्यंत चालतो. अखंड रात्र यासाठी जागवली जाते. गोंधळाची ही अनोखी ही प्रथा आणि परंपरा आजही जुन्या परंपरेनुसार टिकून राहिली आहे. गोंधळासाठी खास करुन बोकडाचा बळी दिला जातो आणि हे मांसाहारी जेवण संपूर्ण गावाला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोंधळ म्हटले की, एक अनोखी पर्वणीच असते. याहीवर्षी हा उत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)अंबाबाईचा गोंधळ घालण्याची प्रथा ही कित्येक वर्षांपूर्वीची जुनी आहे. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली ही प्रथा आजही गावागावांमध्ये जपली जात आहे. गोंधळाच्या कार्यक्रमाला गावाबाहेर असलेले ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात आणि देवीचा गोंधळ मांडतात.