शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या गोंधळाला हजारोंचा ‘उदो उदो’

By admin | Updated: May 21, 2015 00:05 IST

अनेक वर्षांची परंपरा : अख्खा गाव अन् भक्त रात्रभर जागतो...

चिपळूण : उदो गं... अंबाबाई उदो गं... अंबाबाई... अंबाबाईच्या नावाने उदो... उदो... अशी आर्त हाक गोंधळी मनापासून घालतो आणि अंबेला विनवणी करतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने गोंधळास सुरुवात होते. ग्रामीण भागात आजही ही प्रथा आणि परंपरा मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे. ग्रामीण भागात लग्नानंतर किंवा पांजीचा म्हणून गोंधळ घालण्याची परंपरा आजही जोपासली जाते. गोंधळ घातला नाही तर जीवनाचा गोंधळ होतो, असा एक समज असल्याने गोंधळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीनंतर गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. गावोगावी गोंधळ्यांना मोठी मागणी असते. परंतु, काही गोंधळ्यांची ठराविक गावांशी बांधिलकी असते. त्यामुळे त्याच गोंधळ्याला सन्मानाने आणले जाते. त्याला काही अडचण असेल तर त्याच्या परवानगी किंवा त्याने दिलेला दुसरा सहकारी स्वीकारला जातो. देवाच्या नावाने हा गोंधळ सुरु करण्यापूर्वी गावात जोगवा मागितला जातो. त्यानंतर कवड्याची माळ गळ्यात घालून विधिवत मांड भरला जातो. सायंकाळच्या वेळी यजमान दिवटी पाजळतो. यावेळी अंबाबाईच्या नावाचा उदो उदो केला जातो. गोंधळी पहाडी आवाजात पंचक्रोशीतील ग्रामदेवतांना व देवदेवतांना गोंधळासाठी आवाहन करतो. प्रथेनुसार यजमान व त्याचे सहकारी या गोंधळात सहभागी होतात. त्यानुसार त्याची बिदागी ठरलेली असते. ठराविक कुटुंबापेक्षा जास्त दिवट्या पेटल्या, तर त्यासाठी वेगळे मानधन आकारले जाते.एकूणच गोंधळ्यांसाठी हा काळ पर्वणीचा असतो. नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असणारे गोंधळी या काळात रजा काढून आपल्या गावात येतात. त्यामुळे त्यांना डबल उत्पन्न मिळते. बदलत्या चंगळवादाचा फायदा आता याही व्यवसायाला मिळू लागला आहे. खेळीमेळीच्या वातावरणात रात्री कथेचा कार्यक्रम होतो आणि हास्याचे फवारे उडतात.एखादी पौराणिक किंवा काल्पनिक कथा रात्रभर नागरिकांना खिळवून ठेवते. हा कार्यक्रम पहाटे ४ पर्यंत चालतो. अखंड रात्र यासाठी जागवली जाते. गोंधळाची ही अनोखी ही प्रथा आणि परंपरा आजही जुन्या परंपरेनुसार टिकून राहिली आहे. गोंधळासाठी खास करुन बोकडाचा बळी दिला जातो आणि हे मांसाहारी जेवण संपूर्ण गावाला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोंधळ म्हटले की, एक अनोखी पर्वणीच असते. याहीवर्षी हा उत्सव उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)अंबाबाईचा गोंधळ घालण्याची प्रथा ही कित्येक वर्षांपूर्वीची जुनी आहे. ऐतिहासिक काळापासून सुरू असलेली ही प्रथा आजही गावागावांमध्ये जपली जात आहे. गोंधळाच्या कार्यक्रमाला गावाबाहेर असलेले ग्रामस्थही आवर्जून उपस्थित राहतात आणि देवीचा गोंधळ मांडतात.