शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप मुले झाली पोरकी

By admin | Updated: October 30, 2015 22:37 IST

मृत कोकरेच्या मुलांना हवाय आधार : वयोवृद्ध आजी-आजोबांचे मदतीचे आवाहन

वेंगुर्ले : आरवली-टांक-नाबरवाडी येथील आंबा बागेत काम करणाऱ्या मठ कोल्ह्याचे भाट येथील धाऊ रामा कोकरे याचा खून त्याची पत्नी व प्रियकराने केला; परंतु या घटनेनंतर त्यांना असलेल्या दोन्ही मुलांचा आधार नियतीने हिरावून घेतला. त्यांचे वृद्ध आजी- आजोबा हे पालनपोषण करण्यासाठी सक्षम नसल्याने या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही मुलांना शासन, दानशूर संस्था व व्यक्ती यांनी आधार द्यावा, अशी मागणी त्यांचे आजी- आजोबा यांनी केली आहे. अनैतिक संबंधातून मठ येथील धाऊ रामा कोकरे याचा खून पत्नी धनश्री कोकरे व तिचा प्रियकर शाम कासकरने केला. मठ कोल्ह्याचे भाट येथे धनगर समाजातील कोकरे व शिंदे ही दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. धाऊ कोकरे हा मोलमजुरी करून कुटुंब चालवित होता. तर त्यापूर्वी त्याचे वृद्ध आई-वडील रामा द्वारकानाथ कोकरे (वय ७०) व जनाबाई रामा कोकरे (६५) हे कामधंदा करीत असत. रामा कोकरे हे मच्छी विक्रीचा व्यवसाय करीत; परंतु गेली दोन वर्षे त्यांच्या पायाच्या आजारामुळे ते घरीच असल्याने त्यांचा मुलगा धाऊ कोकरे हा कुटुंब चालवित होता. तर त्याचा दुसरा भाऊ धुळू कोकरे हा चिरेखाणीवर मोलमजुरी करतो. तिसरा भाऊ सिदु कोकरे हा शिक्षण घेत आहे. कोकरे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, त्यांना स्वत:चे घरही नाही. धाऊ याचा खून झाल्याने व या खुनात त्याची पत्नी सहभागी असल्याने ती पोलिसांच्या ताब्यात आहे. धाऊचा नऊ वर्षांचा द्वारकानाथ हा मुलगा दुसरीमध्ये आरवली टांक सकाळवाडी येथील प्राथमिक शाळेत, तर पाच वर्षांचा लहान मुलगा लक्ष्मण हा बालवाडीत शिक्षण घेत आहे. समाजातील कुटुंब व्यवस्थेला काळिमा फासणारी ही घटना अतिशय गंभीर व दु:खदायी आहे. मात्र, या चिमुरड्यांना शासनाने मदत करावी, असे आवाहन रामा व जनाबाई या आजी-आजोबांनी केली आहे. (वार्ताहर) आजी-आजोबांची हाक या दोन भावंडांचे वडिलांचे छत्र काळाने हिरावले, तर जन्मदात्री आईनेच परकेपणा करीत या चिमुरड्यांना पोरके केले आहे. ही चिमुरडी मुले आजी-आजोबांच्या कुशीतच आपल्या आई-वडिलांचे छत्र शोधत आहेत; पण सांभाळासाठी ज्या आजी-आजोबाची कूस धरली आहे, तेही आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या मुलांच्या भविष्यासाठी शासनासह समाजाला आर्त हाक देत त्यांच्या पालकत्वाचा भार पेलण्याचे आवाहन केले आहे.