शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आंदोलन सुरूच ठाकर समाज : आजपासून तीव्र होणार

By admin | Updated: August 14, 2014 22:41 IST

आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार

सिंधुदुर्गनगरी : ठाकर समाजाला अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा होऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने ठाकर बांधवांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. तर १५ आॅगस्टपासून हे आंदोलन अधिक तीव्र करत आमरण उपोषण आणि मुंडण आंदोलन छेडण्यात येणार आहे.ठाकर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी ठाकर समाजबांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर साखळी उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी चौथ्या दिवशी उपोषण सुरु आहे तर १५ आॅगस्ट रोजी शासनाचा निषेध करण्यासाठी ठाकर बांधव मुंडण करणार आहेत. तसेच आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.ठाकर समाज (एस.टी.) आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री नारायण राणे यांच्याशी आपल्या मागणीबाबत चर्चा केली. त्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहील. केवळ आश्वासनावर आमचे आता समाधान होणार नाही. कारण यापूर्वी अनेकदा अशी आश्वासने मिळाली होती. मात्र, अद्याप पूर्तता झालेली नाही. तरी जोपर्यंत अनुसूचित जमाती म्हणून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा निर्धार केला आहे. तर हे आंदोलन १५ आॅगस्ट रोजी अधिक तीव्र करून साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात येणार आहे. तर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी बहुसंख्य ठाकर बांधव आपले मुंडण करून घेतील अशी माहिती आंदोलनकर्त्या ठाकर बांधवांनी दिली. (प्रतिनिधी)