शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडे पाठ

By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST

शेतकरी संतप्त : वादळी पावसाच्या नुकसानीचा पंचायत समितीने केला पंचनामा

मडुरा : इन्सुली बिलेवाडी येथे झालेल्या वादळामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली होती. तीन-चार दिवस उलटूनही पंचनामा करण्यात आला नव्हता, अशी संतप्त प्रतिक्रिया बिलेवाडी येथे पाहणीसाठी आलेले सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत आणि जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडली. इन्सुली बिलेवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतजमिनीत कर्ज काढून केळीच्या बागा फुलविल्या होत्या. गणपती सणाच्या हंगामात पिक हाती लागेल अशा योजनेच्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागा फुलविल्या होत्या, परंतु अचानक आलेल्या वादळामध्ये लाखोचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पंचनामा करुनही हाती काही लागणार नसले तरी आपुलकीने येथील फळबागायत आणि शेतकऱ्यांची साधी विचारपूस देखील कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नव्हती. प्रमोद सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारताच प्रत्येक कृषी अधिकारी आपआपली कैफियतच मांडत असल्याचे दिसून आले. यावेळी प्रमोद सावंत आणि गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह गट विकास अधिकारी शरद महाजन, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. एकल, तालुका कृषी अधिकारी बी. वाय. वांवळे, इन्सुली कृषी सहाय्यक अधिकारी पी. पी. सावंत आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.२५ लाख नुकसानइन्सुली कृषी सहाय्यक अधिकारी पी.पी. सावंत यांनी उशिराने पंचनामा दाखल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमित सावंत, भगवान कोठावळे, अनिल आईर, विश्राम गावडे, रामचंद्र तारी, गुरुनाथ गावडे, आप्पा कोठावळे, जेरॉन फर्नाडीस, संतोष सावंत, संतोष मांजरेकर, महादेव सावंत, बापू, कोठावळे, गुरुनाथ गावडे, प्रदीप सावंत, अभय आजगावकर, सखाराम राणे यांची नावे समाविष्ट असून एकूण २४ लाख ६१ हजार २१३ रुपयांचे नुकसान झाले असल्याचा पंचनामा इन्सुली सावंत यांनी सादर केला आहे.