शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

परप्रांतीयांमुळे स्थानिकांची उपासमार!

By admin | Updated: September 11, 2015 22:06 IST

तुषार पाळेकर : परप्रांतीय नौकांचे मत्स्यसाठ्यावर आक्रमण; ‘ती’ जाळी शासनास परत करा

देवगड : शासन युएनडीपीमार्फत मच्छिमारांना शाश्वत मच्छिमारी आणि संवर्धन याबाबतचे धडे देत असताना त्याची अंमलबजावणी स्थानिक मच्छिमार करतात; परंतु यामधून निर्माण होणारा मत्स्यसाठा मात्र, परप्रांतीय नौका अतिक्रमण करून लुटून नेतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक मच्छिमार हैराण झाले आहेत. त्याच्यावर मत्स्योत्पादन घटल्याने उपासमारीची वेळ आली आहे. युएनडीपीमार्फत मच्छिमारांना १९ आॅगस्ट रोजी देण्यात आलेली जाळी शासनास परत करावी, अशा मन:स्थितीत मच्छिमार आहेत. ज्यांना ही जाळी मिळाली आहे त्यांनी ती शासनास परत करावी, असे आवाहन देवगड तालुका युवा मच्छिमार नेते तुषार पाळेकर यांनी केले आहे.पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, युएनडीपीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना शाश्वत मासेमारी व मत्स्यसंवर्धन याबाबत माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली जाते. या माहितीद्वारे जिल्ह्यातील मच्छिमार शाश्वत मच्छिमारी करतात. जेणेकरून मत्स्यसाठा मोठ्या प्रमाणात वाढेल व मत्स्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन येथील स्थानिक मच्छिमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. परंतु, गेली ७ ते ८ वर्षे या जिल्ह्यात परप्रांतीय मच्छिमार महाराष्ट्राच्या ७२0 किलोमीटर सागरी हद्दीत १२ नॉटीकल मैल आत येऊन बेकायदेशीर मासेमारी करीत असल्याने येथील मत्स्यसाठा संपुष्टात येत आहे. त्याबरोबर मत्स्योत्पादन घटत असल्याने मत्स्यसाठा निर्मिती न होता स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)परप्रांतीयांचा धुमाकूळ सुरूचसागरी हद्दीत अतिक्रमण करणाऱ्या या परप्रांतीय नौका हायस्पीड ४00 ते ५00 हॉर्सपॉवर असून, छोट्या पारपंरिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात जाळ््यांचे नुकसान करीत आहेत. यासंदर्भात प्रत्यक्षात जाब विचारला असता त्या परप्रांतीय नौकांवरील खलाशी वर्गाकडून छोट्या मच्छिमारांवर वारंवार हल्ले होऊन मारहाण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या नौकांबाबत संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्यांचा धुमाकूळ हा किनारपट्टीवर सुरूच आहे. जिल्ह्यातील मच्छिमार सक्षमपरप्रांतीय नौकांची तपासणी केली असता नौका परवान्यातील नमूद इंजिन प्रकार, इंजिन क्षमता व प्रत्यक्ष नौकेवरील इंजिन, आदी क्षमता यातही तफावत आढळून येत आहे. या नौकांचा त्रास असाच सुरू राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मच्छिमार परप्रांतीयांचे आक्रमण परतविण्यास सक्षम आहेत, असेही तुषार पाळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.