शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

राष्ट्रीय परिषदेचा देवरुखात समारोप

By admin | Updated: December 11, 2014 23:54 IST

बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर

देवरूख : शहरातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात ‘नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता यांच्या चिरंतन विकासाकरिता संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन बेंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. आर. राव यांच्याहस्ते झाले. तीन दिवसीय परिषदेमध्ये डॉ. पी. जी. दिवाकर यांनी अंदमानातील जाखा आदिवासी यांच्याकडून नैसर्गिक साधनांचा केला जाणारा वापर याबाबत मार्गदर्शन केले. जयंत सरनाईक यांनी ‘लोकसहभागातून देवरार्इंचे संवर्धन’ याविषयी व्याख्यान दिले. मध्यप्रदेश येथील डॉ. सुशांत पुणेकर यांनी ‘जैव सागरी विविधता तसेच पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास’ याबाबत माहिती दिली. बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर यांनी माती व पाणी यांचे कोकणाच्या शाश्वत विकासकरिता संवर्धन याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.पुणे येथील डॉ. टी. सी. तारानाथ यांची जैवसंसाधने आणि त्यांचे व्यवस्थापन, डॉ. एस्. एस्. कांबळे यांनी चिरंतन व आधुनिक शेतीकरिता कीडव्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी परिपूर्ण माहिती दिली. डॉ. पी. तेताली यांनी नष्ट होऊ घातलेल्या सजिवांच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर, डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पतींचा शाश्वत विकासासाठी वापर तसेच डॉ. पी. एस. इंगोले यांनी सागरी जैवविविधता या विषयावर सविस्तर माहिती दिली.तीन दिवसीय परिषदेमध्ये १६ राज्यातून १४० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी संशोधन पेपर सादर केले. समारोप कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रताप नाइकवाडे, डॉ. मीरा काळे, सागर संकपाळ, उदय भाटे, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, संजय टाकळकर, माधुरी जोशी, धनंजय दळवी, अमृता शिंदे, अजिंक्य नाफडे यांनी मेहनत घेतली.(प्रतिनिधी)