शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

व्हेळच्या महिलेची मत्स्यशेतीत सर्वांत उंच झेप

By admin | Updated: August 6, 2014 00:00 IST

संगमेश्वर ते राजापूरपर्यंतची धरणे मत्स्यशेतीसाठी योग्य

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी , कोकणात समुद्राच्या पाण्याबरोबर गोड्या पाण्यातील मासेमारी प्रचलित आहे. समुद्रामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर छाया जाधव या महिलेने धरणातील पाण्यावर सुरू केलेला पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प येथील स्थानिकांना अर्थार्जन मिळवून देणारा ठरला आहे. कोकणातील हा पहिला प्रकल्प असून, महाराष्ट्रातील सहावा प्रकल्प आहे. पाच प्रकल्प विदर्भ व अन्य जिल्ह्यात आहेत.छाया जाधव या मूळ नाखरे गावच्या. मात्र, कायमचे वास्तव्य मुंबईत. पती दीपक जाधव यांनी पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प राबविण्याचे ठरविले. त्याच दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व संपूर्ण जबाबदारी छाया यांनी पेलण्याचे ठरविले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत त्यांनी २०१२ मध्ये शासनाकडे प्रकल्प सादर केला. मान्यता मिळेपर्यंत वर्ष संपले. ‘श्री़ नवलादेवी मत्स्य सहकारी संस्था, लांजा’ची स्थापना करून त्यांनी ‘व्हेळ’ धरणातील पाण्यात तरंगते ३२ पिंजरे सोडले. पैकी ८ पिंजऱ्यात माशांची पिल्ले असून, उर्वरित २४ पिंजऱ्यांमध्ये ५०० ग्रॅम ते १ किलोपर्यंतचे मासे आहेत. यामुळे २५ तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पंगेशीस व मोनोसेस तिलापिया जातीचे मासे या पिंजऱ्यात तयार करण्यात आले आहेत. राजीव गांधी इन्स्टिट्यूट, हैद्राबाद येथून तिलापियाचे, तर कोलकाता येथून पंगेशीसचे बीज आणले. कोकणातील वातावरण माशांसाठी पोषक असून, माशांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. १५ आॅगस्टनंतर मत्स्य उत्पादन सुरू होणार आहे. संपूर्ण भारतभर तसेच परदेशातूनही माशांना मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे मार्केटिंगची चिंता नाही. सुमारे १५० ते २०० टन उत्पन्न अपेक्षित आहे. एक किलोच्या माशाला ८० ते १०० रूपये दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. पावसाळ्यानंतर माशांसाठी शीतगृह, बर्फ तयार करणारा कारखाना, तसेच मत्स्यप्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या स्थानिक युवकांना छत्तीसगड येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिलांचे बचतगट तयार करून त्यांना माशांपासून शेव, कटलेट, वेफर्स, फिंगर्स आदी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जेणेकरून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल. मत्स्यबीज पाण्यात सोडल्यानंतर सात किंवा आठ महिन्यात मासा एक किलोपर्यंत तयार होतो. त्यामुळे दीड वर्षात दोन वेळा उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.  

स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशातून ‘जगन्नाथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून व्हेळ येथे पिंजरा मत्स्यशेती सुरू केली. लवकरच हर्दखळे व झापडे येथे प्रत्येकी ३२ पिंजऱ्यांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही मत्स्यशेती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कोनिया’ जातीचे मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. मत्स्य प्रकल्पासाठी लागणारे बीज, खाद्य, पिंजरे तयार करणारे पूरक उद्योग सुरू करण्याचा मानस आहे. कोकणात उत्पादित होणाऱ्या बांबूवर प्रक्रिया करून त्याचे तरंगते पिंजरे तयार केले जाणार आहेत. तसेच येथील पाटबंधारे विभागाला विनंती करून पाणी सोडताना नियंत्रण करण्याची सूचना करण्यात आली आहे. संगमेश्वर ते राजापूरपर्यंतची धरणे मत्स्यशेतीसाठी योग्य आहेत. - छाया दीपक जाधव