शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रशासनाला सोबत घेऊन जिल्ह्याचा

By admin | Updated: February 3, 2015 23:54 IST

विकास करणार : दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : सर्वांचा आदर ठेवणे हे माझे मी कर्तव्य समजतो. मला प्रेमाने सर्वांना जिंकायचे आहे. समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊनच व त्यांचा विश्वास संपादन करूनच जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक सोमवारी तब्बल आठ तास यशस्वीपणे झाल्यानंतर सिंधुदुर्गनगरीत पत्रकार परिषदेत पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी केसरकर म्हणाले, गोवा राज्यातील प्रवेशासाठी वाहन कर रद्द व्हावा, ही माझी आग्रही भूमिका आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करूनच नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. कारण हा निर्णय विशेष बाब म्हणून घ्यावा लागणार आहे. जिल्हा नियोजनमधून संपूर्ण जिल्ह्याचाच विकास करायचा आहे. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तेव्हा कोणत्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक तालुक्याला कमी-अधिक प्रमाणात विकासकामांना निधी दिला जाईल. प्रत्येक सदस्यांची सूचना लक्षात घेऊनच तसेच सुचविलेल्या कामांना निश्चित न्याय दिला जाईल. जिल्ह्याचा विकास हे माझे ध्येय आहे. त्यामुळे प्रत्येक नियोजन समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तसेच त्यांना विश्वासात घेऊनच मला काम करायचे आहे, असे म्हणाले. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतही सर्वांना बोलण्याची संधी दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काहीवेळा माझे अधिकार वापरून निधी अखर्चित ठेवणाऱ्या, चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज दिली. चांगले काम करा. आमच्याकडून नेहमी प्रेमाची वागणूक मिळेल. तसेच सर्व सदस्यांनीही सहकार्याच्यादृष्टीने प्रश्न उपस्थित करा. विकासात राजकारण नको. मला माझे अधिकार वापरायचे नाहीत आणि ती वेळ येऊ नये, असे सांगितले. आजच्या सभेत ७० कोटींच्या नियोजन आराखड्यास मंजुरी देण्यात आली, तर सन २०१४-१५चा मंजूर निधी मार्चअखेर शंभर टक्के करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आदेश दिले आहेत. यापुढे ती तब्बल दहा तास चालवायला लागली तरी ती समिती सदस्यांचे समाधान होईपर्यंत चालविण्याची तयारी असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा नियोजन अधिकारी धोंडीबा थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)