शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

तिलारी प्रकल्पग्रस्तांबाबत कार्यवाही करा

By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST

दीपक केसरकर यांचे आदेश : जिल्हाधिकारी दालनातील बैठकीत प्रशासनाला सूचना

सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या वनटाईम सेटलमेंटबाबत प्राप्त अर्जांची पंधरा दिवसांत छाननी करून परिपूर्ण अर्जांची यादी शासनाकडे सादर करावी. प्रशासनाने शासनाच्या सूचनांनुसार काम करताना तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या इतर समस्याही समजून घेऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी दालनात तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण आंदोलनाबाबत आयोजित बैठकीत केसरकर बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तिलारी संघर्ष समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.केसरकर म्हणाले, अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांबाबत पंधरा दिवसांनंतर दोडामार्ग येथे जिल्हा प्रशासन व तिलारी प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत दर चार दिवसांनी बैठक घ्यावी. शासनाकडील रेकॉर्डनुसार तपासणी करून ही प्रकरणे सकारात्मकरीत्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी जे अर्ज परिपूर्ण आहेत त्या बाबतीत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. मात्र, ज्या प्रकरणाबाबत संभ्रमावस्था आहे त्यावर जिल्हा प्रशासन व संघर्ष समितीतर्फे तोडगा काढण्यासाठी प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. लाभार्थी प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होऊ नये याकरिता शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने संबंधित कागदपत्रांची रीतसर तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.खासदार विनायक राऊत म्हणाले, मातीकाम, बुडीत क्षेत्र, वसाहतीच्या जमिनी अशा सर्व प्रकारच्या बाधित प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चार एक, बारा दोन, वारसा हक्क, एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक असलेले दाखले याबाबतची संदिग्धता दूर करून हा प्रश्न वेळेत निकाली काढणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासन पातळीवर वेळोवेळी बैठका घेऊन वर्गवारीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करून अपूर्ण अर्जांचा तपशील शासनाकडे सादर करावा. (प्रतिनिधी)‘जलयुक्त शिवार‘ची अंमलबजावणी व्हावीसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश होईल अशारितीने भौगोलिक परिस्थितीनुसार संभाव्य ३५ गावांची निवड करावी. लोकसहभाग, शेतकऱ्यांचा बचत गट, महिला बचत गट, कृषीची आधुनिक साधने या अनुषंगाने परस्पर गावांच्या समन्वयातून जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्याला किमान तीन पिके घेता येतील असे मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. तथापि केवळ पाण्याचा साठा वाढविणे व पाणी टंचाईवर मात करणे हा या अभियानाचा उद्देश नसून त्याचबरोबर अन्नधान्य उत्पादनात वाढ होणे, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणे तसेच शेतकऱ्याला प्रगत कृषी तंत्रज्ञान अवगत होणे व त्या अनुषंगाने गावाचा विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार नियोजन करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते.