शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

तिलारी प्रकल्पग्रस्तांबाबत कार्यवाही करा

By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST

दीपक केसरकर यांचे आदेश : जिल्हाधिकारी दालनातील बैठकीत प्रशासनाला सूचना

सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या वनटाईम सेटलमेंटबाबत प्राप्त अर्जांची पंधरा दिवसांत छाननी करून परिपूर्ण अर्जांची यादी शासनाकडे सादर करावी. प्रशासनाने शासनाच्या सूचनांनुसार काम करताना तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या इतर समस्याही समजून घेऊन तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी दालनात तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण आंदोलनाबाबत आयोजित बैठकीत केसरकर बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तिलारी संघर्ष समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.केसरकर म्हणाले, अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित राहिलेल्या प्रकरणांबाबत पंधरा दिवसांनंतर दोडामार्ग येथे जिल्हा प्रशासन व तिलारी प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत दर चार दिवसांनी बैठक घ्यावी. शासनाकडील रेकॉर्डनुसार तपासणी करून ही प्रकरणे सकारात्मकरीत्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी जे अर्ज परिपूर्ण आहेत त्या बाबतीत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. मात्र, ज्या प्रकरणाबाबत संभ्रमावस्था आहे त्यावर जिल्हा प्रशासन व संघर्ष समितीतर्फे तोडगा काढण्यासाठी प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. लाभार्थी प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होऊ नये याकरिता शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने संबंधित कागदपत्रांची रीतसर तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.खासदार विनायक राऊत म्हणाले, मातीकाम, बुडीत क्षेत्र, वसाहतीच्या जमिनी अशा सर्व प्रकारच्या बाधित प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर चार एक, बारा दोन, वारसा हक्क, एकाच कुटुंबात एकापेक्षा अधिक असलेले दाखले याबाबतची संदिग्धता दूर करून हा प्रश्न वेळेत निकाली काढणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासन पातळीवर वेळोवेळी बैठका घेऊन वर्गवारीनुसार प्राप्त अर्जांची छाननी करून अपूर्ण अर्जांचा तपशील शासनाकडे सादर करावा. (प्रतिनिधी)‘जलयुक्त शिवार‘ची अंमलबजावणी व्हावीसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश होईल अशारितीने भौगोलिक परिस्थितीनुसार संभाव्य ३५ गावांची निवड करावी. लोकसहभाग, शेतकऱ्यांचा बचत गट, महिला बचत गट, कृषीची आधुनिक साधने या अनुषंगाने परस्पर गावांच्या समन्वयातून जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्याला किमान तीन पिके घेता येतील असे मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. तथापि केवळ पाण्याचा साठा वाढविणे व पाणी टंचाईवर मात करणे हा या अभियानाचा उद्देश नसून त्याचबरोबर अन्नधान्य उत्पादनात वाढ होणे, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणे तसेच शेतकऱ्याला प्रगत कृषी तंत्रज्ञान अवगत होणे व त्या अनुषंगाने गावाचा विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार नियोजन करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. यावेळी आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते.