शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू करा

By admin | Updated: April 10, 2015 23:52 IST

मालवणमध्ये बैठक : तहसीलदारांच्या नगरपालिका व ग्रामपंचायतींना सूचना

मालवण : प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर तळागाळापर्यंत त्याबाबत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे हानिकारक प्लास्टिकपासून पर्यावरण वाचविण्यासाठी मालवण तालुक्यात प्लास्टिक बंदीबाबत युद्धपातळीवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना तहसीलदार वनिता पाटील यांनी नगरपालिका व सर्व ग्रामपंचायतींना केली आहे.मालवण तालुक्यामध्ये प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीकरिता मालवण येथील लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळा येथे तहसीलदार वनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक झाली. प्रांताधिकारी रवींद्र बोंबले हे हजर राहू न शकल्याने तहसीलदारांनी बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, नायब तहसीलदार चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद माळी, आदी उपस्थित होते.तहसीलदार पाटील म्हणाल्या, राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या घोषणेनंतर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत प्लास्टिक बंदीचे ठराव घेतले. मात्र, नुसते ठराव न घेता त्याबाबत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापारी व ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या स्तरावर कार्यवाही सुरू करावी. तसेच या कारवाईबाबत वारंवार आढावा घेतला जाईल. आठवडा बाजार, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास घातक असल्याने यास पर्याय म्हणून ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करावा. तसेच प्लास्टिक बंदीचे १०० टक्के पालन झाल्यास व कारवाई सुरू झाल्यास नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल, असेही पाटील म्हणाल्या.यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी, पर्यावरण संतुलित ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी मालवण शहरातील बाजारपेठ व आठवडा बाजारात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर नगरपालिकेने वेळोवेळी कारवाई केली असून, यापुढे अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी तालुका कृषी अधिकारी सुतार, युएनडीपीचे आर्थिक व सामाजिक सल्लागार सुहेल जमादार, भूमिअभिलेख, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग व पोलीस यंत्रणेचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘सिंधुदुर्ग’वर कापडी पिशवी नेणे बंधनकारक करण्याची मागणीकिल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे गुरूनाथ राणे यांनी प्रेरणोत्सव समिती व यूएनडीपी यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना आगाऊ रक्कम घेऊन कापडी पिशव्या दिल्या जातात. किल्ल्यावरून परतल्यावर पिशवी घेऊन आगाऊ घेतलेली रक्कम परत दिली जाते. किल्ला दर्शनासाठी जाताना पर्यटकांकडून वापरण्यात आलेल्या पाण्याच्या बॉटल्स, खाद्य पदार्थांची प्लास्टिकची आवरणे किल्ला परिसरात अथवा समुद्रात न फेकता त्या कापडी पिशवीत जमा कराव्यात, या उद्देशाने ती पिशवी देण्यात येते, असे सांगितले. काही पर्यटक पिशवी न घेताच किल्ल्यावर जातात व प्लास्टिक बॉटल्स फेकून देतात. यामुळे प्रदूषण होत आहे. त्यामुळे अशा कापडी पिशव्या पर्यटकांना जाताना नेणे बंधनकारक करावे, अशी मागणी केली. यावर तहसीलदार पाटील यांनी किल्ला वायरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने यासाठी वायरी ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय सहकार्य देण्यात यावे, असे सांगितले.