शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

हिरवाईनी नटलेली शेतशिवारे सुनीसुनी

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

वन्यप्राण्यांचा उपद्रव : अवानावर येथील शेतकरी हैराण

सुरेश बागवे - कडावल--कधीकाळी अवानाची हिरवीगार दुलई अंगाखांद्यावर मिरवत कुसगाव-गिरगावमधील शिवारे संथ वाऱ्यासंगे मुक्तपणे डोलायची; परंतु आता चित्र पालटले आहे. अवानावर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची गडद छाया निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबरोबरच परडी-परसूही कमी झाल्याने अवान निर्मितीही घटली आणि हिरवाईच्या श्रीमंतीने नटली-सजलेली येथील शेतशिवारे अवानाशिवाय सुनीसुनी दिसू लागली. ‘अवान’ हा शब्द तेव्हा जनमानसात चांगलाच प्रचलित होता. पूर्वी पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी उन्हाळी पिकांमध्ये कुळीथ, चवळी, नाचणी, वाल, वांगी तसेच इतर भाजीपाल्यांच्या पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात कांदे व मिरचीचे उत्पादन घेत असल्याने अवानाला मोठी मागणी होती. अवान विकत घेऊ इच्छिणारे शेतकरी या पारंपरिक रोपवाटिकेत जाऊन रोपांचा दर्जा पाहून ओळीवरच सौदा पटवून व्यवहार करीत असत, तर अवान रुजविणारे शेतकरी काही वेळा आठवडा बाजारात आपल्या मालाची विक्री करीत. मात्र, हा व्यवहार रोपवाटिकाधारक शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचा ठरे. कारण बाजारात या बियाण्याच्या रोपांची विक्री झाली नाही, तर त्यांचे मोठे नुकसान होत असे. अवान निर्मितीपासून हंगामी स्वरुपात रोजगार मिळे, तर परिसरातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध होत. आसपासच्या कित्येक गावांमधील शेतकरी पूर्वी कुसगाव-गिरगाव येथूनच मिरची, कांद्याचे अवान नेऊन आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असत. अवानामुळे कित्येक शिवारे हिरवीगार होऊन डोलायची. उन्हाळी शेती घटली वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवाचा परिणाम अवान निर्मितीच्या व्यवसायावर होऊ लागला. रानडुक्कर, माकडे, हरीण, भेकरे, ससे, गवे यासारखे वन्य प्राणी अवानाचे वाफे उद्ध्वस्त करू लागले आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. ही समस्या एवढी विकोपाला गेली की, नंतर येथील शेतकऱ्यांनी अवान रुजविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविली, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी शेती करणे थांबविले. उन्हाळी शेतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवानाला मागणीही कमी झाली. अवान नाही, म्हणून उन्हाळी शेती नाही आणि उन्हाळी शेती नाही, म्हणून अवानाची निर्मिती नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.पारंपरिक व्यवसाय सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुसगाव व गिरगाव या गावांमधील शेतकरी उन्हाळी शेतीसाठी आवश्यक असलेले ‘अवान’ म्हणजे बियाण्याच्या रोपांची निर्मिती पिढ्यान्पिढ्या करीत असत. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रोपवाटिकेतील निर्मिती ही प्रामुख्याने कांदे व मिरचीच्या अवानाची असायची.