शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

हिरवाईनी नटलेली शेतशिवारे सुनीसुनी

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

वन्यप्राण्यांचा उपद्रव : अवानावर येथील शेतकरी हैराण

सुरेश बागवे - कडावल--कधीकाळी अवानाची हिरवीगार दुलई अंगाखांद्यावर मिरवत कुसगाव-गिरगावमधील शिवारे संथ वाऱ्यासंगे मुक्तपणे डोलायची; परंतु आता चित्र पालटले आहे. अवानावर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची गडद छाया निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबरोबरच परडी-परसूही कमी झाल्याने अवान निर्मितीही घटली आणि हिरवाईच्या श्रीमंतीने नटली-सजलेली येथील शेतशिवारे अवानाशिवाय सुनीसुनी दिसू लागली. ‘अवान’ हा शब्द तेव्हा जनमानसात चांगलाच प्रचलित होता. पूर्वी पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी उन्हाळी पिकांमध्ये कुळीथ, चवळी, नाचणी, वाल, वांगी तसेच इतर भाजीपाल्यांच्या पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात कांदे व मिरचीचे उत्पादन घेत असल्याने अवानाला मोठी मागणी होती. अवान विकत घेऊ इच्छिणारे शेतकरी या पारंपरिक रोपवाटिकेत जाऊन रोपांचा दर्जा पाहून ओळीवरच सौदा पटवून व्यवहार करीत असत, तर अवान रुजविणारे शेतकरी काही वेळा आठवडा बाजारात आपल्या मालाची विक्री करीत. मात्र, हा व्यवहार रोपवाटिकाधारक शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचा ठरे. कारण बाजारात या बियाण्याच्या रोपांची विक्री झाली नाही, तर त्यांचे मोठे नुकसान होत असे. अवान निर्मितीपासून हंगामी स्वरुपात रोजगार मिळे, तर परिसरातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध होत. आसपासच्या कित्येक गावांमधील शेतकरी पूर्वी कुसगाव-गिरगाव येथूनच मिरची, कांद्याचे अवान नेऊन आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असत. अवानामुळे कित्येक शिवारे हिरवीगार होऊन डोलायची. उन्हाळी शेती घटली वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवाचा परिणाम अवान निर्मितीच्या व्यवसायावर होऊ लागला. रानडुक्कर, माकडे, हरीण, भेकरे, ससे, गवे यासारखे वन्य प्राणी अवानाचे वाफे उद्ध्वस्त करू लागले आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. ही समस्या एवढी विकोपाला गेली की, नंतर येथील शेतकऱ्यांनी अवान रुजविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविली, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी शेती करणे थांबविले. उन्हाळी शेतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवानाला मागणीही कमी झाली. अवान नाही, म्हणून उन्हाळी शेती नाही आणि उन्हाळी शेती नाही, म्हणून अवानाची निर्मिती नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.पारंपरिक व्यवसाय सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुसगाव व गिरगाव या गावांमधील शेतकरी उन्हाळी शेतीसाठी आवश्यक असलेले ‘अवान’ म्हणजे बियाण्याच्या रोपांची निर्मिती पिढ्यान्पिढ्या करीत असत. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रोपवाटिकेतील निर्मिती ही प्रामुख्याने कांदे व मिरचीच्या अवानाची असायची.