शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची दमदार सुरूवात

By admin | Updated: July 3, 2014 23:59 IST

शेतकऱ्यांमध्ये समाधान

सिंधुदुर्गनगरी : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या मान्सूनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, गुरूवारी सकाळपासून पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर होता. भातरोपांच्या लावणीसाठी पाणीच नसल्याने शेतकरी हतबल झाला होता. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जोरदार पाऊस हे समीकरण आहे. मात्र, यावर्षी तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याचे आजवरचे समीकरणच बिघडून गेले होते. जूनच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. त्याबरोबर वादळी वाऱ्याचेही आगमन झाल्याने जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले. मात्र, त्यानंतर पावसाने जून अखेरपर्यंत दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. शेतीची कामे खोळंबली होती. काही ठिकाणी पाणीटंचाईचे संकटही कायम होते. गुरूवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाल्याने जिल्हावासीयांची सकाळ आनंददायी ठरली आहे. तर शेतकरी सुखावले आहेत. भातशेतीची रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कामाला जोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ४.८५ मि.मी. एवढा पाऊस झाला तर आतापर्यंत एकूण सरासरी ४४१.५८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ३ जुलैपर्यंत एकूण सरासरी पाऊस १३०७ मि.मी. एवढा झाला होता. गतवर्षीच्या मानाने आतापर्यंत सुमारे ३० टक्के एवढाच पाऊस पडला आहे. मात्र, गुरूवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. (प्रतिनिधी)