शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

जिल्ह्यात पावसाची दमदार सुरूवात

By admin | Updated: July 3, 2014 23:59 IST

शेतकऱ्यांमध्ये समाधान

सिंधुदुर्गनगरी : गेले पंधरा दिवस दडी मारलेल्या मान्सूनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, गुरूवारी सकाळपासून पुन्हा दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर होता. भातरोपांच्या लावणीसाठी पाणीच नसल्याने शेतकरी हतबल झाला होता. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जोरदार पाऊस हे समीकरण आहे. मात्र, यावर्षी तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याचे आजवरचे समीकरणच बिघडून गेले होते. जूनच्या सुरूवातीला पावसाने हजेरी लावली. त्याबरोबर वादळी वाऱ्याचेही आगमन झाल्याने जिल्ह्यातील जनतेचे मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले. मात्र, त्यानंतर पावसाने जून अखेरपर्यंत दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. शेतीची कामे खोळंबली होती. काही ठिकाणी पाणीटंचाईचे संकटही कायम होते. गुरूवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाल्याने जिल्हावासीयांची सकाळ आनंददायी ठरली आहे. तर शेतकरी सुखावले आहेत. भातशेतीची रखडलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कामाला जोर आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ४.८५ मि.मी. एवढा पाऊस झाला तर आतापर्यंत एकूण सरासरी ४४१.५८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ३ जुलैपर्यंत एकूण सरासरी पाऊस १३०७ मि.मी. एवढा झाला होता. गतवर्षीच्या मानाने आतापर्यंत सुमारे ३० टक्के एवढाच पाऊस पडला आहे. मात्र, गुरूवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. (प्रतिनिधी)