शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दलालांना हाकला

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

रामदास कदम : खारी देवणेत बांधकाम मंत्र्यांच्याहस्ते पुलाचे भूमिपूजन

खेड : कोकणात आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणात पिकतो. मात्र, येथील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या या पिकांना संरक्षण मिळत नाही. पिकाला हमी मिळत नाही. इथल्या पिकांचा नफा दलालांच्या घशात जातो. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रथम दलालीतून बाहेर काढणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. कोकणातील आंबा आणि काजू बोर्डाला १00 कोटी रुपये देण्याची मागणीही कदम यांनी या बोर्डाचे प्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. कोकणातील लोकांना संघर्षाशिवाय काही मिळत नसल्याची खंत यावेळी कदम यांनी व्यक्त केली.खेड तालुक्यातील खारी-देवणे येथील ८ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी १0 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अरूणा आंबे्र, रमेश भागवत, संजय बुटाला अ‍ॅड. मिलिंद जाडकर, खेडचे सभापती चंद्रकांत कदम, भगवान घाडगे यांच्यासह असंख्य लोक उपस्थित होते.देवणे पुलाचा खाडीपट्टा, खेड व दापोली तालुक्यातील ४५ गावांना लाभ होणार आहे. रामदास कदम यांनी कोेकणातील समुद्रकिनारी लगतचे सीआरझेड कायदयामध्ये शिथीलता आणावी असे सांगत येथील पर्यटनासाठी आघाडी सरकारने राखुन ठेवलेले २२0 कोटी रूपये परत गेल्याने ती चूक सेना भाजपा सरकार करणार नसल्याचे स्पष्ट केले.देवणे पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर बिरमणी हातलोट घाटाच्या आणि रस्त्याच्या ८ कोटी रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजनही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार असल्याने या मार्गाला मोठे महत्व आले आहे. याकरीता पंकजा मुंडे यांनी २ कोटी २५ लाख रूपये दिले आहेत.बांधकाम मंत्र्यांनी पाडला पैशाचा पाऊसरत्नागिरी जिल्ह्याला यापुढे भरघोस मदत देण्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रस्ते विकासासाठी निधी अपुरा असल्याचे सांगितल्यानंतर पाटील यांनी जिल्ह्याला रस्त्यांसाठी येत्या पुरवणी अधिवेशनात १0 ऐवजी ११ कोटी रूपये देण्याची घोषणा पाटील यांनी केली. वायकर यांनी जिल्ह्यातील साकव बांधकामास अपु-या निधीबाबत सुतोवाच केल्यानंतर पाटील यांनी २0 लाखाच्या ऐवजी आपण येत्या १0 दिवसात ३५ लाख रूपये देण्याचे जाहीर केले. साकव आणि रस्त्यांसाठी मिळून १६ कोटी रूपये जादा देण्याची घोषणा त्यांनी या कार्यक्रमात केली.