शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘किल्ले सिंधुदुर्ग’ अजस्र लाटा झेलण्यास पुन्हा सज्ज

By admin | Updated: January 11, 2017 23:52 IST

तटबंदीचे बांधकाम अंतिम टप्प्यात : शिवकालीन धर्तीवर सुबक कोरीव काम, येत्या दोन महिन्यात होईल पूर्ण

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवणहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी सागरी राजधानी म्हणून बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा पश्चिमेकडील भाग अजस्र लाटांच्या तडाख्याने कमकुवत बनला होता. काही ठिकाणी ढासळलेल्या बुरुज व तटबंदीचे काम ‘पुरातत्त्व’ विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडून तटबंदीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शिवकालीन किल्ल्याच्या बांधकामाच्या धर्तीवर सुबक पद्धतीने कोरीव काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यात तटबंदीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पुरातत्त्व विभागाचे कार्यदर्शक अधिकारी राजेश दिवेकर यांनी व्यक्त केला.शिवाजी महाराजांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेला किल्ले सिंधुदुर्ग देशी-विदेशी लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या पंक्तीत असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही पडझडीचे ग्रहण लागले होते. गड-किल्ले संवर्धनाबाबत शासनाच्या ढीम्म आणि उदासीन धोरणामुळे गड-किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गचे तीन बुरुज व दोन तटबंदी ढासळल्याने चार वर्षांपूर्वी १२ व्या वित्त आयोगातून ३.१९ लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर झाला होता. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत समुद्रात गेली ३५० वर्षे दिमाखदार रूपात किल्ले सिंधुदुर्ग उभा आहे. किल्ले सिंधुदुर्गचा अधिक करून पश्चिम दिशेने येणाऱ्या लाटांमुळे पश्चिमेकडील तट कमकुवत होऊन तो ढासळत चालला होता. यात तटबंदीच्या भिंती कोसळल्याने तटाचे दगड पश्चिम बाजूकडील समुद्रात फेकले गेले. त्यामुळे किल्ल्याच्या शिवकालीन दगडांचा क्रेनच्या सहाय्याने वापर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यातील १२ मीटर तटबंदीचे काम हाती घेण्यात आले असून सुमारे ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.नैसर्गिक सौंदर्य जिवंत ठेवणार : राजेश दिवेकरगडकिल्ल्यांच्या यादीतील किल्ले सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला लाखो शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहे. गेल्या काही वर्षात लाटांच्या माऱ्यात ढासळलेले बुरुज व तटबंदीचे काम हाती घेताना पुरातत्त्व विभागाकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या. महाराजांचा ऐतिहासिक वारसा असल्याने बांधकाम धीम्यागतीने पण शिवकालीनपणा जिवंत ठेवून करण्यात आले. किल्ल्यातील दगड व वाळू उत्खनन अल्प प्रमाणात झाले असून किल्ल्याचे नैसर्गिक सौंदर्य जिवंत ठेवण्यासाठी वापर झाला आहे. येत्या दोन महिन्यात १२ मीटरची तटबंदी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, असे राजेश दिवेकर यांनी सांगितले.तटबंदीचे काम शिवकालीन, कर्नाटकमधील ३४ कारागिरांचा समावेशपुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या तटबंदी व बुरुजांचे बांधकाम शिवकालीन धर्तीवर करण्यात येत आहे. यासाठी स्थापत्य अभियंता व किल्लेदार हरीश गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक येथील ३४ कुशल कामगार मेहनतीने काम करत आहेत. यासाठी लागणारी साधनसामुग्री उपलब्ध झाली आहे. यात वीस डंपर दगड, दोन ट्रक विटा, एक ट्रक चुना व अन्य साहित्य बांधकामासाठी उपलब्ध झाले आहे. किल्ल्यात उपलब्ध असलेले नैसर्गिक दगड व अत्यल्प प्रमाणात वाळू बांधकामासाठी वापरली जात आहे. नैसर्गिक दगड वापरण्यात येत असल्याने किल्ल्याच्या सौंदर्याला अधिक झळाळी येणार आहे, असेही पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. यापूर्वी तीन बुरुजांचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पश्चिम तटबंदीचे काम शिल्लक राहिले असून गेल्या महिन्यापासून काम हाती घेण्यात आले आहे. तटबंदी बांधताना झाराप येथील दगड वापरले जात असून किल्ल्यातील नैसर्गिक दगडांचा वापर केला जात आहे. क्रेन व ३४ कामगारांच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक काम युद्धपातळीवर सुरू आहे. तटबंदी उभी राहत असताना तिला शिवकालीन टच देण्याचा पुरातत्त्व विभागाचा मानस आहे. १२ मीटरच्या शेवटच्या तटबंदीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच ते पूर्ण करण्यात येईल.