शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गला पर्यटन ओळख शिवसेनेनेच दिली

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

शंकर कांबळी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे केले कौतुक

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून, पर्यटन जिल्हा म्हणून खरी ओळख शिवसेनेनेच जिल्ह्याला दिली आहे, असे उद्गार माजी आमदार शंकर कांबळी यांनी काढले. ते सावंतवाडी पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल आदींनी उपस्थित राहत पर्यटन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेने शहराला एक पर्यटनाचा वारसा दिला आहे. गेली ११ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करणे शक्य नाही. पण ते पालिका करीत आहे. या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घोषणा केली आहे. त्यानंतर हा जिल्हा नेहमीच विकासाच्या प्रतिक्षेत राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्याचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन तेली यांनी नगरपालिकेने आपले सातत्य नेहमी ठेवून महोत्सव साजरा केला. सावंतवाडी आधी सुंदर होतीच. मात्र, नगरपालिकेने दर्जेदार प्रकल्प राबवत आणखी सुंदर केली. त्यामुळे पालिकेला भविष्यातही लागणारी सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी सावंतवाडीप्रमाणेच वेंगुर्लेमध्येही जानेवारी किंवा फेबु्रवारीमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी कुबल यांनी केली. यावेळी नगरसेविका स्रेहा कुबल, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)भक्ती संगीताबरोबरच नाट्यसंगीताची मेजवानीसावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायिका साधना घैसास व सारेगम फेम नचिकेत देसाई या दोघांनी भक्तीसंंगीत व नाट्यसंगीताच्या तालावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तीसंगीतात दत्ता दिगंबरा दिगंबरा..., तर विविध नाट्यसंगीत सादर केली. यावेळी प्रख्यात तबलावादक साई बँकर यांनी कार्यक्रमात चांगलीच जान भरली. त्याचे श्रोत्यांनी चांगलेच कौतुक केले. तर सावंतवाडीतील नीलेश मेस्त्री यांनी हार्माेनियमची सुंदर साथ यावेळी दोघांनाही दिली. निवेदक शित्रे यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली. त्यांनी सावंतवाडीतील रसिकांनी आतापर्यंत कला जिवंत ठेवल्याची सांगितले होते. तशी कला आजही जिवंत असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आल्याचे त्यांनी सांगितले.