शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सिंधुदुर्गला पर्यटन ओळख शिवसेनेनेच दिली

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

शंकर कांबळी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे केले कौतुक

सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून, पर्यटन जिल्हा म्हणून खरी ओळख शिवसेनेनेच जिल्ह्याला दिली आहे, असे उद्गार माजी आमदार शंकर कांबळी यांनी काढले. ते सावंतवाडी पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल आदींनी उपस्थित राहत पर्यटन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेने शहराला एक पर्यटनाचा वारसा दिला आहे. गेली ११ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करणे शक्य नाही. पण ते पालिका करीत आहे. या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घोषणा केली आहे. त्यानंतर हा जिल्हा नेहमीच विकासाच्या प्रतिक्षेत राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्याचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन तेली यांनी नगरपालिकेने आपले सातत्य नेहमी ठेवून महोत्सव साजरा केला. सावंतवाडी आधी सुंदर होतीच. मात्र, नगरपालिकेने दर्जेदार प्रकल्प राबवत आणखी सुंदर केली. त्यामुळे पालिकेला भविष्यातही लागणारी सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी सावंतवाडीप्रमाणेच वेंगुर्लेमध्येही जानेवारी किंवा फेबु्रवारीमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी कुबल यांनी केली. यावेळी नगरसेविका स्रेहा कुबल, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)भक्ती संगीताबरोबरच नाट्यसंगीताची मेजवानीसावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायिका साधना घैसास व सारेगम फेम नचिकेत देसाई या दोघांनी भक्तीसंंगीत व नाट्यसंगीताच्या तालावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तीसंगीतात दत्ता दिगंबरा दिगंबरा..., तर विविध नाट्यसंगीत सादर केली. यावेळी प्रख्यात तबलावादक साई बँकर यांनी कार्यक्रमात चांगलीच जान भरली. त्याचे श्रोत्यांनी चांगलेच कौतुक केले. तर सावंतवाडीतील नीलेश मेस्त्री यांनी हार्माेनियमची सुंदर साथ यावेळी दोघांनाही दिली. निवेदक शित्रे यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली. त्यांनी सावंतवाडीतील रसिकांनी आतापर्यंत कला जिवंत ठेवल्याची सांगितले होते. तशी कला आजही जिवंत असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आल्याचे त्यांनी सांगितले.