शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

सामायिक सातबाराधारकांना तिसरे अनुदान ठरणार वरदान

By admin | Updated: November 5, 2015 00:20 IST

निधी मंजूर : नुकसानभरपाई घेऊन जाण्याचे आवाहन...

सुभाष कदम===चिपळूण अवेळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. ज्यांचे सातबारा एकेरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, सामायिक सातबारा उतारे असणाऱ्या बागायतदारांना आता तिसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागणार आहे. ही रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती बागायतदारांना मिळणार आहे. डिसेंबरनंतर आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येतो. त्यानंतर फळधारणा होण्याच्या काळातच गेल्यावर्षी पाऊस पडला होता. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. उरल्यासुरल्या मोहोरावर फळधारणा झाली होती. परंतु, जानेवारीनंतर पडलेल्या वादळी पावसाने त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच यावर्षीचे आंबा व काजूपीक हातचे गेले होते. त्यामुळे बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मागणी सुरु झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन नुकसानभरपाई जाहीर झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने त्यांचे संमतीपत्र किंवा प्रत्येकाचे बँक खाते मिळणे गरजेचे होते. अनेकांनी आपले खाते नंबर किंवा काहींनी आपले प्रस्ताव तलाठ्यामार्फत जमा केले. त्यांना लाभ मिळाला. परंतु, ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे खातेदार या भरपाईपासून वंचित राहिले.या खातेदारांना आता तिसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे. वैयक्तिक लाभार्थींना मिळाला लाभचिपळूण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर ६२ लाख ६१ हजार २५० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थींना लाभ देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये अनुदान प्राप्त. दुसऱ्या टप्प्यात ६२ लाख ६१ हजार २५० रुपये अनुदान प्राप्त. तिसऱ्या टप्प्यात १ कोटी १६ लाख ८७ हजार १२० रुपये अनुदान येणे बाकी. आतापर्यंत वैयक्तिक सातबाराधारकांना अनुदान प्राप्त. सामायिक सातबाराधारकांना तिसऱ्या टप्प्यात मिळणार न्याय.