शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामायिक सातबाराधारकांना तिसरे अनुदान ठरणार वरदान

By admin | Updated: November 5, 2015 00:20 IST

निधी मंजूर : नुकसानभरपाई घेऊन जाण्याचे आवाहन...

सुभाष कदम===चिपळूण अवेळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. ज्यांचे सातबारा एकेरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, सामायिक सातबारा उतारे असणाऱ्या बागायतदारांना आता तिसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागणार आहे. ही रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती बागायतदारांना मिळणार आहे. डिसेंबरनंतर आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येतो. त्यानंतर फळधारणा होण्याच्या काळातच गेल्यावर्षी पाऊस पडला होता. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. उरल्यासुरल्या मोहोरावर फळधारणा झाली होती. परंतु, जानेवारीनंतर पडलेल्या वादळी पावसाने त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच यावर्षीचे आंबा व काजूपीक हातचे गेले होते. त्यामुळे बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मागणी सुरु झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन नुकसानभरपाई जाहीर झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने त्यांचे संमतीपत्र किंवा प्रत्येकाचे बँक खाते मिळणे गरजेचे होते. अनेकांनी आपले खाते नंबर किंवा काहींनी आपले प्रस्ताव तलाठ्यामार्फत जमा केले. त्यांना लाभ मिळाला. परंतु, ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे खातेदार या भरपाईपासून वंचित राहिले.या खातेदारांना आता तिसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे. वैयक्तिक लाभार्थींना मिळाला लाभचिपळूण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर ६२ लाख ६१ हजार २५० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थींना लाभ देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये अनुदान प्राप्त. दुसऱ्या टप्प्यात ६२ लाख ६१ हजार २५० रुपये अनुदान प्राप्त. तिसऱ्या टप्प्यात १ कोटी १६ लाख ८७ हजार १२० रुपये अनुदान येणे बाकी. आतापर्यंत वैयक्तिक सातबाराधारकांना अनुदान प्राप्त. सामायिक सातबाराधारकांना तिसऱ्या टप्प्यात मिळणार न्याय.