शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

सामायिक सातबाराधारकांना तिसरे अनुदान ठरणार वरदान

By admin | Updated: November 5, 2015 00:20 IST

निधी मंजूर : नुकसानभरपाई घेऊन जाण्याचे आवाहन...

सुभाष कदम===चिपळूण अवेळी पावसामुळे आंबा, काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. ज्यांचे सातबारा एकेरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, सामायिक सातबारा उतारे असणाऱ्या बागायतदारांना आता तिसऱ्या टप्प्यातील नुकसान भरपाईवर अवलंबून राहावे लागणार आहे. ही रक्कम मंजूर झाली असून, लवकरच ती बागायतदारांना मिळणार आहे. डिसेंबरनंतर आंबा व काजूच्या झाडांना मोहोर येतो. त्यानंतर फळधारणा होण्याच्या काळातच गेल्यावर्षी पाऊस पडला होता. त्यामुळे मोहोर मोठ्या प्रमाणावर गळून गेला होता. उरल्यासुरल्या मोहोरावर फळधारणा झाली होती. परंतु, जानेवारीनंतर पडलेल्या वादळी पावसाने त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच यावर्षीचे आंबा व काजूपीक हातचे गेले होते. त्यामुळे बागायतदार, शेतकरी हवालदिल झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी मागणी सुरु झाली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देऊन नुकसानभरपाई जाहीर झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन सामायिक आहे, एकापेक्षा जास्त खातेदार असल्याने त्यांचे संमतीपत्र किंवा प्रत्येकाचे बँक खाते मिळणे गरजेचे होते. अनेकांनी आपले खाते नंबर किंवा काहींनी आपले प्रस्ताव तलाठ्यामार्फत जमा केले. त्यांना लाभ मिळाला. परंतु, ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे खातेदार या भरपाईपासून वंचित राहिले.या खातेदारांना आता तिसऱ्या टप्प्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन नुकसान भरपाई घेऊन जावी, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे. वैयक्तिक लाभार्थींना मिळाला लाभचिपळूण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर ६२ लाख ६१ हजार २५० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक लाभार्थींना लाभ देण्यात आला. पहिल्या टप्प्यात ५९ लाख ५७ हजार ७५० रुपये अनुदान प्राप्त. दुसऱ्या टप्प्यात ६२ लाख ६१ हजार २५० रुपये अनुदान प्राप्त. तिसऱ्या टप्प्यात १ कोटी १६ लाख ८७ हजार १२० रुपये अनुदान येणे बाकी. आतापर्यंत वैयक्तिक सातबाराधारकांना अनुदान प्राप्त. सामायिक सातबाराधारकांना तिसऱ्या टप्प्यात मिळणार न्याय.