शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात जहाजाच्या सिग्नलमुळे खळबळ

By admin | Updated: September 22, 2016 00:36 IST

सुरक्षा यंत्रणा सतर्क : कवडा रॉक परिसरातील प्रकार

मालवण : कवडा रॉक परिसरात १२ ते १५ वाव खोल समुद्र्रात अज्ञात जहाजाचे धोक्याचे संकेत (सिग्नल) मालवण व तळाशील येथील मच्छिमारांना दिसून आल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे. हे जहाज मालवाहू असण्याची शक्यता आहे. अद्ययावत संकेतप्रणाली बसविण्यात आलेल्या या जहाजाने तब्बल नऊवेळा सिग्नल दिले असल्याने हे सिग्नल धोक्याचे असल्याचे मालवण येथील प्रत्यक्षदर्शी मच्छिमारांनी सांगितले. मच्छिमारांनी या घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली आहे. हे जहाज दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वेंगुर्ले, तसेच निवती समुद्रात या जहाजाचा मोठा आवाज आल्याने तेथील मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे जहाज मालवण किनारपट्टीवर दाखल झाले असून, अंधार पडल्याने जहाज नेमके कसले आहे, हे सांगणे कठीण होते. मात्र, रात्री ८ वाजता या जहाजाने चार पिवळे, दोन हिरवे, तर तीन लाल सिग्नल दाखविल्याचे सांगण्यात आले. हे जहाज १० ते १५ वाव खोल समुद्र्रात असून, आचऱ्याच्या दिशेने संथ गतीने पुढे सरकत असल्याची माहिती तळाशील येथील मच्छिमारांनी दिली. याबाबत मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधून माहिती दिली आहे. (प्रतिनिधी) जहाज कोस्ट गार्डचे याबाबत मच्छिमारांनी माहिती घेतली असता हे जहाज मालवाहू नसून ते कोस्टगार्ड विभागाचे असल्याचा संदेश आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र्र शिंदे यांना मिळाला आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांनी घाबरू नये, असे आवाहन करताना हे जहाज रात्रीचे पेट्रोलिंग करण्यासाठी आले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून सागरी सुरक्षेसाठी कोस्ट गार्ड यंत्रणेकडून समुद्रात पेट्रोलिंग व्हावे, अशी मागणी होती. तशा पद्धतीचे हे पेट्रोलिंग असू शकते, असे तोरसकर यांनी सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती. सिग्नल कशासाठी? हे जहाज नेमके कोणते होते, हे अंधारामुळे समजणे कठीण झाले असले तरी जहाजाने सिग्नल नेमके कशासाठी दिले? जहाजाच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला का? याबाबत मच्छिमारांमध्ये संभ्रम असून, समुद्र्रात वादळसदृश स्थिती असल्याने या जहाजाने किनारपट्टीचा आसरा घेतला तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या घटनेमुळे जिल्हा सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.