शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

बचतगटांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: August 19, 2015 22:57 IST

निला नायर : कालवा संवर्धन उपक्रमाबाबत वाडातर बैठकीत मार्गदर्शन

देवगड : पश्चिम किनारपट्टीवर अशा प्रकारच्या कालवा संवर्धन अभिनव उपक्रमांची सुरूवातच पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिकांना चांगली उपजिविका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परदेशात याची विक्री करण्यासाठी खाडी पात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उपक्रमासाठी बचतगटातील महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्राधिकरण भारत सरकारच्या अध्यक्षा श्रीमती निला नायर यांनी व्यक्त केले.वाडातर येथील सुधीर जोशी यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच उल्का जोशी, मुख्य वनरक्षक कांदळवन कक्ष एन. वासूदेवन, समुद्र उत्पादक व निर्यात विकास प्रधीकरण भारत सरकारचे उपसंचालक अनिल कुमार, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट डॉ. सुबिर घोष, रोहीत सावंत, वनक्षेत्रपाल एम. एस. शेळके, सोहेल जमादार, अन्वेश्वर भंगे, दुर्गा सावंत, दया पत्की, नाबार्ड उपव्यवस्थापक अ‍ॅनी अलेक्झेंडॉर, दाजी पवार, उमेश परब आदी उपस्थित होते.नायर यांनी महिला बचतगटाशी संवाद साधून हा उपक्रम कशा पद्धतीने राबवत असून त्याचा विविधतेचा अनेक प्रकारचा उलघडा करून याविषयी संपूर्ण माहिती घेतली व प्रसिद्ध महिला बचतगटाला याविषयक मार्गदर्शन केले. मच्छि वाळवून ती विकणे हा सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार महिलांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व अनिर्बंध यांत्रिक मासेमारी यामुळे गेल्या ५-६ वर्षापासून कोकण किनारपट्टी क्षेत्रात कमालीचा मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. साहजिकच पारंपरिक मच्छिमारांसमोर रोजगाराचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कालवा संवर्धन प्रकल्प यशस्वी करून रोजगाराचा नवा व सुलभ मार्ग मच्छिमार महिलांना दाखवून दिला आहे.प्रसिध्दी महिला बचत गट यांच्याशी संवाद साधताना हा उपक्रम कशाप्रकारे यशस्वी केला याचा उलघडा त्यांनी केला. वाडातर येथील प्रसिद्धी महिला बचतगटाने कांदळवन कक्ष, मुंबई व युएनडीपी यांच्यामार्फत हा कालवा संवर्धन प्रकल्प तेथील खाडीत राबविला. केवळ १५ महिन्याच्या कालावधीत या प्रकल्पातून बचत गटाला दीड लाखांचे उत्पादन मिळाले. हा प्रकल्प राबविताना ३० बांबूचा मंडप खाडीत उभारण्यात आला. त्यानंतर एका रोपाला पाच पाच कालवांची रिकामी खरपे बांधून तळाला वाळू चूना लावलेले कौल बांधण्यात आले. असे ३०० ते ३५० रोप खाडीत उभारलेल्या बांबूच्या मंडपाला बांधण्यात आले. पंधरा महिन्यांच्या कालावधीत बांधण्यात आलेल्या खरप्यांना शेवाळ पकडणार नाही याची काळजी महिला बचतगटातील सदस्यांनी घेतली. पंधरा महिन्यानंतर खाडीतील बांबूच्या मंडपाला बांधलेले रोप बाहेर काढले असता एका एका रोपाला १० ते २५ कालवे धरली होती. २५० ग्रॅम वजनाचे एक कालव होते. केवळ १६ हजाराच्या खर्चात या कालव संवर्धन प्रकल्पातून सहा हजार कालवे मिळाली. या कालवांना एका डझनला अडीचशे रूपये एवढा दर मिळाल्याने केवळ १६ हजाराच्या गुंतवणुकीतून बचतगटाला सव्वा लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले.पावसाळयात पाणी गोड झाल्याने कालवे निर्जीव होतात. त्यामुळे त्यांना चांगला दर मिळत नाही. मात्र आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अंडी धरण्याच्या कालावधी असल्याने कालवांचे मिळणारे उत्पादन हे दर्जेदार असते. त्यामुळे या कालवांना चांगला दर मिळतो. पावसाळयात कालवांना डझनाला १५० रूपये दर मिळत असताना हाच दर आॅक्टोबरनंतर डझनाला ३०० ते ३५० रूपये मिळत असल्याचे महिला बचतगटाच्या अध्यक्षा कस्तुरी ढोके यांनी सांगितले.प्रसिद्धी महिला बचतगटाच्या अध्यक्ष कस्तुरी ढोके, सायली फडके, भावना जुवाटकर, अनुष्का ढोके, प्रज्ञा ढोके, सायली वाडेकर, शुभदा जूवाटकर, संध्या पडेलकर, संजना भाबल, पार्वती जुवाटकर, दिपीका भाबल, सुलभा जावकर या सदस्यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. (प्रतिनिधी)दक्षता घ्यावीआंतरराट्रीय बाजारपेठेत कालवा उपलब्ध झाल्यास त्यांना डझन मागे ३०० ते ४०० रूपये उत्पन्न मिळू शकते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविताना खाडीच्या नदीपात्रात अशुद्ध पाणी मिसळणार नाही याची दक्षता घेण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले.