शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे पहा

By admin | Updated: February 4, 2015 23:56 IST

माधव गाडगीळ : वेंगुर्ले येथील कार्यक्रमात विकासनिधीवर विचारमंथन

वेंगुर्ले : पर्यावरण आणि विकासनीती याचा विचार करताना प्रथम विकास म्हणजे नेमके काय हवे, याचा विचार व्हायला हवा. विकासाच्या प्रक्रियेत औद्योगिकरणाला महत्त्व आहे. मात्र, पर्यावरणाचा ऱ्हास करून नव्हे. कोणताही प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. याकडे लक्ष पुरविले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्याावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केले. येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात रविवारी रात्री झालेल्या श्रीधर मराठे स्मृती ‘जागर विचारांचा’ या खास कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गाडगीळ यांच्या व्याख्यानानंतर सिंधुदुर्गतील विविध भागांतून आलेल्या अनेकांनी प्रश्न विचारून विकासनिधीवर विचारमंथन केले. यावेळी दादा परूळेकर, अ‍ॅड. देवदत्त परूळेकर, विजय पालकर उपस्थित होते. डॉ. गाडगीळ म्हणाले, गाडगीळ अहवाल हा तंत्रशुद्ध निकषांवर खूप मेहनत घेऊन प्रत्यक्षदर्शी तयार केला आहे. अहवालात विकासाला अडसर होईल, अशी कोणतीही सूचना नाही. जनतेने या अहवालाचा अभ्यास करायला हवा. आपला देश सार्वभौम आहे. येथे लोकशाही आहे. त्यामुळे जनतेला काय हवे आणि काय नको, याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. कायद्यांचे उल्लंघन होऊन विकास नको, असे ते म्हणाले. शेवटी पर्यावरणाचे संवर्धन हेसुद्धा महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरण नष्ट झाले, तर त्यात माणसाचा ऱ्हासही निश्चित आहे. व्याख्यानानंतर झालेल्या खुल्या चर्चेत भरत आळवे, ओमकार तुळसुलकर, रविकिरण तोरसकर, पत्रकार महेंद्र पराडकर, हर्षद तुळपुळे, विजय रेडकर, समीर बागायतकर, जितेंद्र वजराटकर, प्रा. सुनील भिसे, प्रा. वामन गावडे, प्रा. राजाराम चौगुले, बाळू खामकर आदींसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अ‍ॅड. देवदत्त परूळेकर यांनीही विचार मांडले. महेंद्र मातोंडकर यांनी सूत्रसंचालन, तर अ‍ॅड. शशांक मराठे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)गोव्यातील खाण व्यवसायात गैरव्यवहारखाणबंदीमुळे गोव्याची अर्थव्यवस्था कोसळली, लाखो रुपयांचा रोजगार बुडाला, असे चित्र निर्माण केले जाते. प्रत्यक्षात मात्र गोव्यावर विपरित परिणाम झाला नसल्याचे निदर्शनास येते. अनेक लोक शेतीकडे वळले. पर्यटन व्यवसाय वाढला. येथील खाण व्यवसायात पस्तीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे ते म्हणाले. रासायनिक उद्योगाचा विपरित परिणामरत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील रासायनिक उद्योगाचा पर्यावरण व त्या अनुषंगाने समाजावर विपरित परिणाम झाल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या उद्योगामुळे काहींना रोजगार मिळाला, तरी दोन हजार उद्योग नष्ट झाले. वसिष्ठी नदी प्रदूषित झाली. मच्छिमारांपुढे तर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. ‘ठेवणीतला लोणचा’ चे प्रकाशनगाडगीळ यांच्या व्याख्यानाआधी विजय पालकर यांच्या मालवणी भाषेतील ‘गजाली ठेवणीतला लोणचा’ व कथाकार अरुण सावळेकर यांच्या ‘ललितबंध’ या पुस्तकांचे प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. श्वेता पालकर यांनी गजाली वाचून दाखविल्या त्यालाही रसिकांचा प्रतिसाद लाभला. या पुस्तकातील रेखाचित्रे व मुखपृष्ठ साकारणाऱ्या कुडाळ येथील रजनीकांत कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.राजकारण म्हणजे चिखल४माधव गाडगीळ यांनी राजकारण म्हणजे चिखल आहे, या चिखलात आपल्याला पडायचे नाही, तो आपला प्रांत नाही, असे स्पष्ट केले. ४मालवण येथील प्रजत तोरसकर या छोट्या विद्यार्थ्याने गाडगीळ यांना तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमचे पर्यावरण धोरण काय असेल, असा खोचक प्रश्न उपस्थित करून माधव गाडगीळ यांना बोलते केले.