शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

शाळांचे दुसरे सत्र ठरणार धावपळीचे!

By admin | Updated: November 23, 2015 00:30 IST

विविध उपक्रम : दिवस कमी कार्यक्रम जास्त

टेंभ्ये : शाळांचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरु होत आहे. परंतु, इ. १० वी व १२वीच्या परीक्षांना जेमतेम ८० ते ९० दिवस शिल्लक रहात असल्याने हे सत्र धावपळीचे ठरणार आहे. या सत्रामध्येच शाळांचे अनेक अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम असतात. त्याचबरोबर १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य या सर्वांमुळे शाळांची अवस्था ‘रात्र थोडी व सोंग फार’ अशी होणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१४-१५चे दुसरे सत्र सोमवार दि. २३पासून सुरु होत आहे. यावर्षी दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा करून सराव घेणे अपेक्षीत असते. विद्यार्थ्यांची परीक्षांच्या दृष्टीकोनातून तयारी करुन घेण्यासाठी हा कालावधी महत्वाचा मानला जातो.दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा महोत्सव भरवला जातो. यासाठी किमान ३ ते ५ दिवस लागतात.समाजसेवा शिबिरांचे आयोजन यादरम्यान केले जाते. अनेक शाळा डिसेंबर, जानेवारी महिन्यात वनराई बंधारे बांधतात. शाळांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजनही डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यांच्या दरम्यान केले जाते. अनेक शाळांचे स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम दि. २६ जानेवारीला आयोजित केले जातात. या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच या सत्रामध्ये दुसऱ्या सत्रातील पहिली घटक चाचणी व १० वी, १२ वीच्या पूर्व परीक्षा घेतल्या जातात. या सर्व शैक्षणिक उपक्रम व परीक्षांसाठी किमान २५ ते ३० दिवस लागतात. उर्वरित दिवसांमध्ये दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम व १० वी, १२ वीच्या तोंडी परीक्षा, प्रकल्पकार्य पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र इ. १०वी व १२वीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. या सत्रामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा कालावधी असल्याने प्रत्येक दिवसाचे शैक्षणिक मूल्य लक्षात घेऊन याचा वापर करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी केले आहे. (वार्ताहर)बोर्ड परीक्षेच्या तयारीचा कालावधी - किरण लोहारदुसरे सत्र म्हणजे विशेषत: इ. १०वी व इ. १२वी परीक्षेच्या अंतिम तयारीचा कालावधी मानला जातो. या कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी आवश्यक असते. या दरम्यान असणारे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहेत. या शैक्षणिक वर्षात दुसरे सत्र लहान असल्याने शाळांना व शिक्षकांना काटेकोरपणे वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. या सत्रातील इ. १० वी, १२ वीच्या दृष्टीने कामाच्या दिवसांची संख्या जेमतेम ८० ते ९० दिवस भरणार आहे. यावर्षी अधिक महिना आल्याने गणेशोत्सव, दीपावली हे सण जवळपास एक महिन्याने पुढे ढकलल्याने पहिले सत्र मोठे तर दुसरे सत्र जवळपास एक महिन्याने कमी झाले आहे. या सत्रामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम शाळांमध्ये राबविले जातात.