शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

मालवण किनारपट्टीवरच टंचाईच्या झळा

By admin | Updated: April 17, 2017 23:37 IST

देवबाग, तळाशीलमध्ये क्षारयुक्त पाणी : किनारपट्टीभागात होणार टँकरने पाणीपुरवठा, तालुक्यात भूजल पातळी वाढली

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच काही भागात पाण्याची मोठी समस्या भासते. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने तसेच पंचायत समितीच्यावतीने चोख नियोजन राबविण्यात आल्याने मालवण तालुक्यात किनारपट्टीचा भाग वगळता यंदाच्या वर्षी पाणीटंचाईच्या झळा तितक्याशा जाणवू लागल्या नाहीत. तालुक्यातील काही गावांमध्ये नळपाणी योजनेच्या समस्या उद्भवू लागल्या असल्या तरी भीषण पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. मात्र, गेली काही वर्षे मार्चपासून किनारपट्टीवरील क्षारयुक्त पाण्याच्या समस्येला पर्याय उपलब्ध करून देणे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य राहणार आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षारयुक्त पाण्याची मोठी समस्या उभी आहे. क्षारयुक्त पाणी पिण्यास योग्य नसल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. दुसरीकडे काही गाव वगळता पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने पाणीटंचाईवर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. मालवण तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणार्थ मालवण पंचायत समितीच्यावतीने जिल्हा परिषेदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आलेल्या आराखड्यातील २५ कामाना मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील आचरा जामडूलवाडी येथील एक काम हे राष्ट्रीय पेयजलमधून घेण्यात आले आहे. यात नळयोजना दुरुस्त करणे - मठबुद्रुक लिंग्रसवाडी, चाफेखोल गोसावीवाडी, निरोम भरडवाडी, मसुरे मर्डे, मालोंड गावठाणवाडी, आनंदव्हाळ कदमवाडी, वराड बौद्धवाडी, राठीवडे पुजारेवाडी या कामाचा समावेश आहे. विंधन विहीर विशेष दुरुस्तीमध्ये घुमडे घाडीवाडी, हडी भटवाडी, हडी देऊळवाडी, हडी गडगेवाडी, हडी गावकरवाडी, वायंगवडे धनगरवाडी या कामांचा समावेश आहे. नवीन विंधन विहिरीमध्ये बांदिवडे खोरेवाडी, बुधवळे कुडोपी बौद्धवाडी या कामांचा समावेश आहे. तात्पुरती पूरक नळपाणी योजनेत वराड भरडवाडी, महान घाडीवाडी, आचरा जामडूल या कामांचा समावेश आहे. विहीर खोल करणे व गाळ काढणे तसेच सार्वजनिक विहीर दुरुस्ती करणे यात राठीवडे गोंजाचीवाडी, निरोम मांजरेकरवाडी, घुमडे घुमडाई मंदिर, कुंभारमाठ जरीमरीवाडी, निरोम देऊळवाडी, कोळंब कातवड, चाफेखोल मधली गावकरवाडी या कामांचा समावेश आहे. तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून खारट पाण्याची तीव्रता वाढत असल्याने त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. दरवर्षी प्रामुख्याने सर्जेकोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते. गतवर्षी तळाशील गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. किल्ले सिंधुदुर्गवरही उन्हाळी सुट्टीत पाण्याची समस्या भेडसावते. किल्ल्यात असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. पुरातत्त्व विभागाकडून सुरु असलेल्या तटबंदीचे कामही पाण्याअभावी थांबविण्यात आले आहे.