शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

संभाजी चौकात झेंडा फ डकतच राहणार

By admin | Updated: April 2, 2016 00:05 IST

स्वराज्य संघटना : सावंतवाडी नगरपरिषदेत ‘बेवारस’ पक्षाची सत्ता

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवबंधन बांधून भगवा हाती घेतलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेतील नगराध्यक्षांनी सावंतवाडी नगरपरिषद कोणत्या राजकीय पक्षाची आहे, हे जाहीर न केल्याने ती बेवारसच असल्याचे सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षांनी नगरपरिषद कोणत्या पक्षाची हे जाहीर न केल्यास स्वराज्य संघटनेतर्फे सावंतवाडी नगरपरिषद बेवारस असल्याचे जाहीर करण्यात येईल, असे पत्रक स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आले आहे.सावंतवाडी शहर हे संस्थानकालीन ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. शहराचा इतिहास पाहता संस्थानकालीन आपला झेंडा भगवा झेंडा म्हणूनच फडकविलेला आहे आणि आजही तो तसाच फडकवत आहे. म्हणून या भगव्या झेंड्याला शहरातील कोणत्याही जाती-धर्माचा विरोध नाही. पण झेंड्याच्या छत्रछायेखाली जी मंडळी राजकारणात मोठी झाली, त्यांनाच शहरातील जातीय सलोखा बिघडण्यासाठी संभाजी चौक येथील सन्मानाने फडकणारा भगवा झेंडा उतरविण्याची दुर्बुध्दी सुचलेली आले. संभाजी चौक हे नाव शिवजयंती दिवशी त्याच भागातील शिवप्रेमींनी जाहीर केल्याने शासकीय सोपस्कार पूर्ण करण्याबाबत सहा महिन्यांपूर्वीच सनदशीर मार्गाने पत्र दिले आहे. त्यामुळे रहिवाशांची इच्छा असताना पालिकेच्या डोळ्यात भगवा झेंडा का खुपत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. याच ठिकाणी सिस्टर डोराथी पार्कचे नाव असलेला फलक कोणीही काढलेला नाही. त्यामुळे संस्थानकाळापासून गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या सावंतवाडीवासीयांमध्ये जातीवाद निर्माण करण्याचाच हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे आणि याविरोधात स्वराज्य संघटना कायमच उभी ठाकली आहे. जिथे जिथे भगव्याचा अपमान होईल, तिथे तिथे स्वराज्य संघटना स्वाभिमानाने सर्व तयारीनिशी उतरणार आहे. यावेळी अमोल साटेलकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अ‍ॅड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, रवींद्र वेंगुर्लेकर, सोमनाथ गावडे, संदीप धुरी, सुशांत पाटणकर आदी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीपत्रकावर सह्या आहेत. (वार्ताहर)नगरपरिषद प्रशासनाचे गैरकृत्यसंभाजी चौकात फडकविलेला झेंडा काढण्यासाठी कुणीही उताविळ होऊ नये. महाराष्ट्रात कोठेही भगवा झेंडा फडकविला आणि तो उतरावयाचा असल्यास शासकीय अध्यादेशाप्रमाणे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊनच त्यांच्या रितसर परवानगीनेच झेंडा उतरवावा लागतो. पण याचा अभ्यास नसलेली मंडळी नगरपरिषदेच्या प्रशासनातून गैरकृत्य करीत आहे. संभाजी चौकामध्ये फडकाविण्यात आलेला भगवा ध्वज हा विनाविरोध बसविण्यात आला आहे. तरीही काही विघ्नसंतोषी लोक तो झेंडा म्हणजे अतिक्रमण असल्याचा भास निर्माण करत आहे. वास्तविक पाहता, हा झेंडा फडकविण्यात स्थानिकांच्या भावनांची कदर करणे गरजेचे आहे.