शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चाळीस हजार शिक्षकांचे वेतन रखडले

By admin | Updated: February 2, 2015 23:50 IST

परवड कायमचीच : शिक्षकांचे प्रतिनिधी असूनही प्रश्न अनुत्तरीतच...

चिपळूण : राज्यातील चाळीस हजार शिक्षकांचे गेले दोन महिने रखडलेले वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी शिक्षक नेते, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.राज्याच्या शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजली आहे. अनेक शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजपा युती सरकारच्या अनास्थेमुळे शिक्षकांना फटका बसत आहे. प्राथमिक, माध्यमिक, सर्वशिक्षा अभियानच्या ४० हजार शिक्षकांना दोन महिने वेतन न मिळाल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यांच्यावर उपासमारीसारखी वेळ आली आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अच्छे दिनचे गाजर दाखवणाऱ्या सरकारच्या नावाने शिक्षकांचा शिमगा सुरु आहे, असेही जोशी यांनी सांगितले. राज्यातील अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थीसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न शासनाकडून अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळीच निर्णय झाला नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असेही जोशी यांनी सांगितले.शासनाने चुकीच्या धोरणामुळे शिक्षक अतिरिक्त ठरवले आहेत. त्यांचे वेतन रोखणे, योग्य शाळांमध्ये समायोजन न करणे चुकीचे आहे. अशा शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पध्दतीने देण्याचे आदेश काढूनही त्याची पायमल्ली होत आहे. विधानपरिषदेत सात पदवीधर व सात शिक्षक आमदार आहेत. पण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे. शासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसत असल्याने निर्णय बदलावा व वेतनाचा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)