शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

‘रोहयो’ मार्गी लावा

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

अधिकारी, सदस्यांमध्ये एकमत : कणकवली पंचायत समिती मासिक सभा

कणकवली : एमआरईजीएसमधील ६०-४० चे प्रमाण ठेवून कामे करताना अडचणी येत आहेत. देवगड, मालवणमध्ये जशी अ‍ॅडजस्टमेंट करण्यात आली तशी करा मग कामे मार्गी लागतील, असा सूर पंचायत समिती सभेत निघाला. एमआरईजीएसची कामे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणींचा पाढा गटविकास अधिकाऱ्यांनी वाचला. कणकवली पंचायत समितीची मासिक सभा प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती भिवा वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहाय्यक गटविकास अधिकारी एम.ए.गवंडी उपस्थित होते.एमआरईजीएसचा लक्ष्यांक साध्य करताना अडथळ्यांचा पाढाच सहाय्यक गटविकास अधिकारी गवंडी यांनी वाचला. आमच्याकडे तांत्रिक मनुष्यबळ नाही. गोठे, विहिरी ही कामे साठ-चाळीसच्या निकषात बसत नाहीत. अधिकारी आपल्या पदभार सांभाळून रोहयोची कामे करतात. प्रत्येक काम आॅनलाईन असून बीएसएनएलकडून इंटरनेटची समस्या निर्माण होत आहे. तरीही तालुक्यात ५२ टक्के काम पूर्ण झाले असून ६७ लाख रूपये खर्च झाले आहेत, असे गवंडी म्हणाले. यावर सदस्य बबन हळदिवे यांनी ग्रामसेवकांचा आढावा घेतला नसल्याबाबत ताशेरे ओढले आणि तुमच्यात काम करायची मानसिकता नसेल तर इतर कामे कशी करतील? असा प्रश्न केला. निकषात कामे तुम्ही बसवा, असा सूर सदस्य सुरेश सावंत यांनी लावला. निकषाचा अडथळा होता तरी आतापर्यंत गोठ्यांची कामे झाली. प्रस्ताव मागवताना निकषाची समस्या सोडवायला हवी, असे भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले. गवंडी हे कामे अडवत असल्याचा आरोप सदस्यांमधून झाल्यावर त्यांनी त्याचे उदाहरण सांगा, असा आग्रह धरला. ते म्हणाले की, तालुक्यातून वैयक्तिक स्वरूपाची शौचालये, गोठे, विहिरी अशी कामे जास्त प्रस्ताव येतात. त्यापेक्षा रस्त्यांची साईडपट्टी आदी सार्वजनिक उपयोगाची कामे जास्त आल्यास साठ-चाळीसच्या निकषाचे संतुलन होऊ शकते. निव्वळ मंजुरीचा भाग असलेली कामेच तालुक्यात होत नाहीत. फक्त ११ रस्त्यांची कामे सुरू आहेत. यानंतर सभापतींनी दखल देत अकुशल कामांचा भाग वाढवल्यास संतुलन होऊ शकते, असे भाग्यलक्ष्मी साटम यांनी सांगितले. सदस्यांनी आम्ही सहकार्य करतो पण अधिकारी आपल्या बाजूने सहकार्य करणार का? देवगड, मालवणमध्ये जशी ‘माणुसकी’ दाखवत कामे मार्गी लावण्यात आली तशी लावणार का? असा प्रश्न केला. या मुद्यावर बराचकाळ चर्चा झाली. तालुक्याला १ कोटी ३० लाखाचा लक्ष्यांक असून मार्चअखेरपर्यंत किती पैसे खर्च करणार? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाकडून अद्याप एकदशांश कामे झाली नसल्याचे गवंडी यांनी सांगितले. कृषी, लघुपाटबंधारे, ग्रामपंचायत पाणी पुरवठा, आणि बांधकाम विभागाचे सहकार्य मिळाल्यास निश्चितपणे लक्ष्यांक पूर्ण करता येईल, असे गवंडी यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून काम अडवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कारवाई केली जावी, असे उपसभापती वर्देकर यांनी सूचना केली. (प्रतिनिधी)रब्बी शेतीचे नुकसान करणाऱ्या मोकाट गुरांना पायबंद घालणे आवश्यक असल्याची सूचना दादा कर्ले यांनी मांडली. त्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र देऊन कोंडवाडा निर्माण करण्यासह उपाययोजना करण्याचे पत्र पाठवण्यात यावे तसेच पंधरा दिवसांनी याचा आढावा घेण्याचा ठराव सभापतींच्या सूचनेने घेतला.