शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

योग्य आहार, व्यायाम हाच पर्याय

By admin | Updated: June 27, 2014 00:53 IST

मधुमेह दिन विशेष : तज्ज्ञांच्या मते वैद्यकीय सल्ला अधिक महत्त्वाचा

अजय लाड ल्ल सावंतवाडीमधुमेह हा दीर्घकालीन उपचार करावा लागणारा आजार आहे. मधुमेह या आजारात शरीरातील स्वादुपिंडाकडून पुरेसे इन्सुलिन तयार केले जात नाही, अथवा तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. या आजाराने गंभीर स्वरुप घेतल्यास यात मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण होतो. मधुमेह होण्याचे नेमके कारण अनभिज्ञ असून आनुवंशिक व जीवनशैली यामुळे हा आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मधुमेह पूर्णपणे बरा होण्यासाठी अजूनही औषध सापडलेले नसले तरीही योग्य आहार, व्यायाम व इन्सुलिनच्या वापराने मधुमेह आटोक्यात ठेऊन सामान्य आयुष्य जगता येऊ शकते.भारत देशात २७ जून रोजी मधुमेह रोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मधुमेह दिन पाळला जातोे. शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिन तयार न झाल्यास रक्तातील उपलब्ध ग्लुकोज पेशींना न मिळता रक्तातच राहते. मधुमेहाचे निदान व उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, पाणी जास्त पिणे, जास्तवेळा मूत्र विसर्जनास जावे लागणे, थकवा, चिडचिडेपणा, निरुत्साहपणा, वारंवार तोंड सुकणे, जनांगाना खाज येणे, भूक जास्त लागणे अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी मूत्र परीक्षणामध्ये ग्लुकोज जास्त प्रमाणात आढळून येते. साधारणत: मधुमेहाचे पाच प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे नवजात मधुमेह. असा मधुमेह बालवयात वा प्रौढवयात प्रकट होतो. अशा रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात अथवा इन्सुलिन तयारच होत नाही. तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी किंवा जास्त होत असते. या रुग्णांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. तर दुसऱ्या प्रकारातील मधुमेह सहसा पन्नाशीच्या आत होत नाही. बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जास्त वजन असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. या मधुमेहाला वयोमानानुसार होणारा मधुमेहही संबोधतात. या मधुमेहावर योग्य आहार, व्यायाम व तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांनी नियंत्रण ठेवता येते. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. तिसरा प्रकार म्हणजे कुमारवयात निदान होणारा मधुमेह. याप्रकारातील मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे. हा मधुमेह वयाच्या १२ ते १७ या वयात आढळून येतो. चौथ्या प्रकारात महिलांना अतिलठ्ठपणामुळे गर्भारपणातही मधुमेहाला सामोरे जावे लागते. तसेच अतिगोड व तेलकट खाण्यामुळेही मधुमेहाला आमंत्रण मिळते. पाचव्या प्रकारात स्वादुपिंडाच्या विकारामुळेही मधुमेह होत असतो. या सर्व मधुमेहाच्या प्रकारात काळजी घेणे आवश्यक आहे.मधुमेहाची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाणे योग्य ठरते. कंटाळा येणे, तीव्र तहान व मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही काही लक्षणे आहेत. वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास विलंब, मूत्रमार्गाचे संसर्ग, हिरड्यांचे आजार किंवा अंधुक दृष्टी या लक्षणांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. मधुमेह झाल्याचे समोर येण्यास काही आठवडेही लागू शकतात अथवा काही वर्षेही मधुमेह झाल्याचे समजत नाही. यासाठी योग्यवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्यास मधुमेह झाल्याचे लक्षात येते. मधुमेहाचे निदान मूत्रपरीक्षण, रक्त तपासण्या करुन केले जाते. जेवल्यानंतर ग्लुकोज परीक्षण, ग्लुकोज टोलरन्स टेस्ट आदीनेही मधुमेहाची खात्री आपल्याला करुन घेता येते. मधुमेहावर ठोस उपाय नसला तरीही रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण योग्य ठेवणे व मधुमेह नियंत्रणात ठेऊन त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांवर रोख लावल्यास सामान्य जीवन जगता येऊ शकते. आहारातील योग्य बदल, पुरेसा व्यायाम केल्यास रोग आटोक्यात राहतो. या सर्वांबरोबरच अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ला घेणे खूप गरजेचे मानले जाते. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याचा अवलंब केल्यास रुग्णाला मधुमेह आटोक्यात ठेवण्यात यश मिळते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूचीचिकित्सा तसेच वनौषधींच्या वापरानेही रक्तातील ग्लुकोज योग्य प्रमाणात राखले जाऊ शकते. मधुमेही व्यक्तीवरील ताण कमी होण्यासाठी योगा तसेच संमोहनही लाभदायक ठरु शकते. मात्र, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.