शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखंडित विजेसाठी ‘रहाटाघर’चा पर्याय

By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST

महावितरण कंपनी : रत्नागिरी शहराला दिलासा मिळणार, फेब्रुवारीअखेर वीज उपकेंद्र कार्यरत होणार

रत्नागिरी : शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ग्राहकांना विनाखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी शहरात रहाटाघर उपकेंद्र उभारण्यात आले आहे. हे उपकेंद्र रनपार, हार्बर व कुवारबाव उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास या उपकेंद्रावरून तातडीने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल.रत्नागिरी शहरात चाळीस हजार वीज ग्राहक आहेत. तसेच झाडगाव, हार्बर, नाचणेरोड व एमआयडीसी मिळून चार उपकेंद्र आहेत. हार्बर उपकेंद्र ज्यावेळी बंद पडते, त्यावेळी निम्मे शहर अंधारात लोटते. भविष्यात ग्राहकांना अंधारात न ठेवण्यासाठी उपकेंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या रहाटाघर उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे.हार्बर, झाडगाव उपकेंद्राला महापारेषणच्या कुवारबाव उपकेंद्रातील ११० केव्ही वाहिनीवरून वीजपुरवठा होतो. या वाहिनीवर बिघाड उद्भवल्यास चारही उपकेंद्र ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यावेळी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार आहे, तर रहाटाघर उपकेंद्राला ११० के. व्ही. रनपार वाहिनीवरून वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. तसेच रहाटाघर व हार्बर उपकेंद्र जोडले जाणार आहेत. शिवाय एमआयडीसी व नाचणे उपकेंद्र निवळीला जोडणार आहेत. जेणेकरून तातडीच्या वेळी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. रहाटाघर उपकेंद्र सुसज्ज झाले असून, काही चाचण्या सुरू आहेत. लवकरच हे उपकेंद्र ग्राहकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. रहाटाघरसाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना रहाटाघर येथे वीजबिल भरणे सुलभ होणार आहे.महावितरण कंपनीकडून पायाभूत आराखडा दोनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत, तर उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्राचे काम सुरू आहे, तर कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, केवळ वालोपे उपकेंद्र जागेअभावी संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उभारण्यात येणार आहे.रहाटाघर वीज उपकेंद्रामुळे आता महावितरण कंपनीच्या कामकाजात आणखी सुसूत्रता येणार आहे. (प्रतिनिधी)फिडरवरील ताण होणार कमीसोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महावितरणची वीज वितरण व्यवस्था आणखीन सुधारणार आहे. गेले अनेक महिने महावितरणला पर्यायी वीजपुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्राहकांना अंधारात राहावे लागत होते.चार उपकेंद्ररत्नागिरी शहरात चाळीस हजार ग्राहक, तर झाडगाव, हार्बर, नाचणे रोड व एमआयडीसी अशी चार उपकेंद्र.हार्बर उपकेंद्र बंद पडल्यास आता रहाटाघरचा पर्याय.कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार.