शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

अखंडित विजेसाठी ‘रहाटाघर’चा पर्याय

By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST

महावितरण कंपनी : रत्नागिरी शहराला दिलासा मिळणार, फेब्रुवारीअखेर वीज उपकेंद्र कार्यरत होणार

रत्नागिरी : शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ग्राहकांना विनाखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी शहरात रहाटाघर उपकेंद्र उभारण्यात आले आहे. हे उपकेंद्र रनपार, हार्बर व कुवारबाव उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास या उपकेंद्रावरून तातडीने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल.रत्नागिरी शहरात चाळीस हजार वीज ग्राहक आहेत. तसेच झाडगाव, हार्बर, नाचणेरोड व एमआयडीसी मिळून चार उपकेंद्र आहेत. हार्बर उपकेंद्र ज्यावेळी बंद पडते, त्यावेळी निम्मे शहर अंधारात लोटते. भविष्यात ग्राहकांना अंधारात न ठेवण्यासाठी उपकेंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या रहाटाघर उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे.हार्बर, झाडगाव उपकेंद्राला महापारेषणच्या कुवारबाव उपकेंद्रातील ११० केव्ही वाहिनीवरून वीजपुरवठा होतो. या वाहिनीवर बिघाड उद्भवल्यास चारही उपकेंद्र ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यावेळी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार आहे, तर रहाटाघर उपकेंद्राला ११० के. व्ही. रनपार वाहिनीवरून वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. तसेच रहाटाघर व हार्बर उपकेंद्र जोडले जाणार आहेत. शिवाय एमआयडीसी व नाचणे उपकेंद्र निवळीला जोडणार आहेत. जेणेकरून तातडीच्या वेळी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. रहाटाघर उपकेंद्र सुसज्ज झाले असून, काही चाचण्या सुरू आहेत. लवकरच हे उपकेंद्र ग्राहकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. रहाटाघरसाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना रहाटाघर येथे वीजबिल भरणे सुलभ होणार आहे.महावितरण कंपनीकडून पायाभूत आराखडा दोनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत, तर उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्राचे काम सुरू आहे, तर कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, केवळ वालोपे उपकेंद्र जागेअभावी संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उभारण्यात येणार आहे.रहाटाघर वीज उपकेंद्रामुळे आता महावितरण कंपनीच्या कामकाजात आणखी सुसूत्रता येणार आहे. (प्रतिनिधी)फिडरवरील ताण होणार कमीसोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महावितरणची वीज वितरण व्यवस्था आणखीन सुधारणार आहे. गेले अनेक महिने महावितरणला पर्यायी वीजपुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्राहकांना अंधारात राहावे लागत होते.चार उपकेंद्ररत्नागिरी शहरात चाळीस हजार ग्राहक, तर झाडगाव, हार्बर, नाचणे रोड व एमआयडीसी अशी चार उपकेंद्र.हार्बर उपकेंद्र बंद पडल्यास आता रहाटाघरचा पर्याय.कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार.